ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले:म्हणाले – बिहार, झारखंड, मध्य प्रदेश अन् छत्तीसगड नसते, तर मुंबईने काय पाहिले असते?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजप खासदार निशिकांत दुबे मुंबई व महाराष्ट्राच्या मुद्यावर पुन्हा एका बरळलेत. बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश व झारखंड नसते, तर मुंबईने काय पाहिले असते? आम्ही राजे आहोत, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या डुबे डुबे करत मारेंगे या इशाऱ्यानंतर आपण 4 वेळा मुंबईत येऊन गेल्याचेही सांगितले. निशिकांत दुबे यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना वरील विधान केले आहे. ते म्हणाले, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, बंगालचे लोक मुंबई व महाराष्ट्रात जातात. त्यानंतर तेथील लोकांना विशेषतः मुंबईतील लोकांना वाटते की, हे लोक आमच्या वाट्याचे घेत आहेत. बिहारी कब्जा करत आहेत असे त्यांना वाटते. पण आम्ही या देशातील सर्वात मोठे करदाते आहोत. मुंबई व महाराष्ट्र नसता तर कदाचित देश चालणार नाही, हेच अनेक वर्षांच्या आंदोलनाचे प्रमुख कारण आहे. ही लढाई आहे. पण माझे म्हणणे आहे की, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश व छत्तीसगड नसते तर मुंबईने काय पाहिले असते? स्टेट बँक ऑफ इंडिया संपूर्ण देशातून कर गोळा करते. एलआयसी, सेबी, एनएसई कर देते. टाटाचे मुख्यालयही तिथे आहे. झारखंड नसते तर टाटा कधी टाटा बनले नसते. बिर्लाही नसते. या देशातील 40 ते 45 टक्के कोळसा व खनिज संपत्ती केवळ झारखंडकडे आहेत. आदी बिहारकडे होते, जेव्हा बिहार एकसंध होता. आम्ही याविषयी राजे आहोत. कराच्या जोरावर तुम्ही स्वतःला राजे समजता निशिकांत दुबे पुढे म्हणाले, आम्ही राजे आहोत, परंतु आमचे दुर्दैव असे आहे की, इथले वातावरण त्यांना सूट करत नाही. त्यामुळे सर्व लोकांनी आपली मुख्यालये मुंबईत बनवली आहेत. त्यांच्या कराच्या जोरावर तुम्ही स्वतःला राजे समजता. या लोकशाहीत जनता राजा आहे. ते मदत देतात म्हणून आम्ही निवडून येतो. गांधी – नेहरू घराणे राजे नाही. जी लढाई गांधी नेहरू कुटुंबासोबत आहे, तीच बाषा मी राज ठाकरेंना वापरली. निशिकांत दुबे यांनी यावेळी राज ठाकरे यांच्या धमकीनंतर मी 4 वेळा मुंबईला येऊन गेल्याचेही सांगितले. राज ठाकरेंनी गतवर्षी मला धमकी दिली. पण त्यानंतर मी 4 वेळा मुंबईला जाऊन आलो. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही तिथे भेट घेतली, असे ते म्हणाले. आता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे? राज ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या प्रचारसभेद्वारे निशिकांत दुबे यांचा समाचार घेतला होता. ‘दुबे, तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, तुम्हाला मुंबईच्या समुद्रात बुडवून मारू. महाराष्ट्रात येऊन कुणीही मराठी व्यक्तीच्या अंगावर आला तर त्याला ठेचायचे. आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही, असे ते म्हणाले होते. त्यानंतर दुबे यांनी राज यांच्या टीकेचा व्हिडिओ पोस्ट करत मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली? असा उपरोधिक पलटवार केला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर