माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येतअसलेल्या बारावीच्या परीक्षेत शनिवारी (दि.२१) गणिताचा पेपर झाला. या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण २६८८७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. जिल्हाभरातील ८७ केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. यातील २२ केंद्र ही संवेदनशील आहेत. दरम्यान, गणिताच्या पेपरला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव (ब्रु.) येथील परीक्षा केंद्रावर कॉपी करताना एक विद्यार्थी सापडला. जिल्हा दक्षता पथकातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या रत्नमाला खडके यांनी कॉपीबहाद्दर विद्यार्थ्याला पकडल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूत्रांकडून समजले. गणिताचा पेपर असल्यामुळे काही अपवाद सोडल्यास बहुतांश विद्यार्थी तणावात होते. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक दिसून आली. कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समिती व माध्यमिक शिक्षण विभाग विशेष दक्षता बाळगत आहे. हुशार विद्यार्थ्यांचे परीक्षेत नुकसान होऊ नये, गुणवत्तेला चालना मिळावी, यासाठी भरारी व बैठ्या पथकांची तैनाती करण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रांवर बैठ्या पथकांचा पहारा आहे तर भरारी पथके अचानक केंद्रांवर पोहोचून तपासणी करत आहेत. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीलावण्यात आले असून सीसीटीव्हीनसणाऱ्या परीक्षा केंद्रावरीलपर्यवेक्षकांनी अदलाबदल करण्यातयेत आहे. परीक्षा केंद्राबाहेर वआवारात पोलिसांचा बंदोबस्त आहे.त्यामुळे भयमुक्त व कॉमीमुक्तवातावरणात परीक्षा घेण्यात यश येतअसल्याचे दिसून येत आहे. दुपारी २ वाजता पेपर सुटल्यानंतर विद्यार्थी रिलॅक्स दिसून आले. यंदाचा गणिताचा पेपर खूप कठीणनव्हता, अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी बोलताना दिली. काही विद्यार्थ्यांना सी सेक्शन कठीणवाटला तर काहींना डी सेक्शन अवघड होता, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी पेपर सुटल्यानंतर दिल्या. गतवर्षीच्या तुलनेत पेपर सोपा यावर्षीचा गणिताचा पेपर गतवर्षीच्या तुलनेत खूप सोपाहोता. ग्रुप सी व ग्रुप डी मधील प्रश्न विद्यार्थ्यांना स्कोअरकरण्यासाठी उपयुक्त दिसून आले. कॅल्क्युलस, भूमिती,बीजगणीत, प्रॉबॅबिलिटीवरील प्रश्नांची काठिण्य पातळीसामान्य होती. त्यामुळे विद्यार्थी गणितात यावर्षी चांगलेगुण घेण्याची संधी दिसून येत आहे.