शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 2 मध्ये मंगळवारी सकाळी एका खासगी व्यक्तीने चक्क कार्यालयाचा ताबा घेऊन निबंधकांच्या खुर्चीवरबसण्याचा धक्कादायक प्रकार घडला. अबुलाला हाश्मी असे या व्यक्तीचे नाव असून, त्याने अधिकारी वेळेवर येत नाहीत, त्यामुळे “जनतेने मला नियुक्त केले आहे” असे म्हणत शासकीय कागदपत्रे हाताळली. याप्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे खडबडून जागे होत प्रशासनाने त्याच्या विरोधात गुन्हा दाखलकेला. या प्रकारामुळे दिवसभर कार्यालय बंद राहिले.रजिस्ट्रीसाठी आलेल्या जवळपास पाचशे नागरिकांना ताटकळत बसावे लागले. मंगळवारी सकाळी 10:30 वाजेपर्यंत दुय्यम निबंधक राजेश राठोड कार्यालयात हजर झाले नव्हते. अधिकारी नसल्याने नागरिक ताटकळत उभे होते. याचा फायदा घेत अबुलाला हाश्मी याने कार्यालयात हस्तक्षेप केला.”अधिकारी वेळेवर येत नाहीत. आता मीच कारभार करणार,” असे म्हणत तो मुख्य खुर्चीवर बसला. त्यानेसमोर असलेले शासकीय दस्तऐवज हाताळले. सर्वांचेदस्त नोंदवले जातील, असे उपस्थितांना जाहीर केले. 15 – 20 मिनिटांच्या या ”हायव्होल्टेज ड्रामा” चा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. हा व्हिडिओ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी सहजिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांची कानउघाडणी केली. नोंदणी कार्यालये बंदमुळे कोट्यवधींचामहसूल बुडाला, नागरिकांनाही मनस्ताप या घटनेनंतर सिटी चौक पोलिस ठाण्यात हाश्मी आणि त्याच्या 10 ते 15 साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ तक्रार देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी पोलिस ठाण्यात गेल्याने तिन्ही नोंदणी कार्यालये बंद ठेवण्यात आली. यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दिवसभरातील सुमारे 1 ते 1.5 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. दलाल आणि ब्लॅकमेलिंगची चर्चा या निमित्ताने नोंदणी विभागातील “अर्थपूर्ण” साखळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.कार्यालयातील काही कर्मचारीच खासगीव्यक्तींना गोपनीय माहिती देऊन अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यास मदत करतात, अशी चर्चा सुरू आहे. हा आरोपीही एजंट असून त्याच्याकडूनच अधिकारी पैसे घेत असल्याने त्याची हिंमत वाढल्याचीही चर्चा दिवसभर सुरू होती.
