कर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहेत. उजनी धरण येथून सोडलेले पाणी भीमा नदीवरील उमराणी गावाजवळ उभारलेल्या नव्या बंधाऱ्यात अडवले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या अडवणुकीमुळे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती धोक्यात आली आहे. उमराणी येथे सुमारे एक टीएमसी पाणी रोखल्याने महाराष्ट्रातील नऊ गावांना थेट फटका बसत आहे. नदीचा प्रवाह खाली पोहोचत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. सहा फेब्रुवारी रोजी उजनी धरणातून भीमा नदीत सुमारे चार हजार चारशे क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. मात्र, हे पाणी उमराणी बंधाऱ्यात अडवले गेल्याने खालील भागात पोहोचलेच नाही. परिणामी लवंगी, पाटीलनगर, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर आणि चिंचपूर या गावांतील पिकांना पाण्याचा पुरवठा थांबला आहे. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उभ्या पिकांवर संकट आले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाण्याअभावी शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पाणीअभावी परिस्थितीचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. मंद्रूपसह आठ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही बंद पडला आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्याय शोधावे लागत आहेत. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केल्यावर सरकारकडे बोट दाखवले जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधी आणि शेतकरी करत आहेत. मंद्रूप आणि परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप उमराणी बंधाऱ्यातून पाणी खाली सोडण्यात आलेले नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. कर्नाटक सरकार हुकूमशाही वागत असल्याचा आरोप दरम्यान, सोलापुरातील लोकप्रतिनिधीही या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. कर्नाटकने उजनीचे पाणी अडवल्यानंतर प्रशासनाने पुढील पाणी सोडणे थांबवले आहे. त्यामुळे सादेपूरखालील गावांमधून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येऊ लागल्या आहेत. शेतकरी आणि ग्रामस्थांनी हा विषय अधिवेशनात मांडून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आपल्या प्रतिनिधींना केली आहे. कर्नाटक सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. दोन्ही राज्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आहे. खाली पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तरीही, जोपर्यंत उमराणी बंधाऱ्यातील पाणी खाली सोडले जात नाही, तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे प्रश्न सुटणार नाहीत. या संपूर्ण प्रकरणाकडे दोन्ही राज्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे
कर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित:उमराणी बंधाऱ्यात उजनीचे पाणी अडले; शेतीचा प्रश्न गंभीर
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
साताऱ्यातील करंजेत गॅरेज चालकावर कोयत्याने हल्ला:शाहूपुरी पोलिसांकडून...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
मुंबईत माझ्याविरोधात कट, स्टिंग ऑपरेशनमध्ये महिलेचा सहभाग:कट...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
अजित पवारांचा विमान अपघात हा घातपातच:आमदारांचा अवमान...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
मेधा सोमय्या मानहानी खटल्यात संजय राऊतांना दिलासा:शौचालय...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
मरीनड्राईव्ह पोलिसांचा रोहित पवारांच्या अर्जावर महत्त्वाचा निर्णय:काल...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
अर्थसंकल्पीय अधिवेशन:महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकोनॉमी झाल्यावर जगातील...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
