ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

स्मार्ट मीटर विरोधात शेतकरी, शेतमजुरांची धडक मोहीम:तिवसा येथे तीव्र आंदोलन, म्हणाले – अदानीच्या लाभासाठी चाललेली लूट थांबवा : शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र राज्य किसान सभा व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या (लालबावटा) तिवसा तालुका शाखेच्यावतीने आज, सोमवारी, महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ग्राहकांकडून सध्याच्या मीटरबाबत कोणतीही तक्रार नसताना केवळ अदानी कंपनीच्या फायद्यासाठी जुने मीटर बदलून सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा शासनाने लावला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. हे नवीन स्मार्ट मीटर बसवताच वीजबिलात थेट १०० ते २०० टक्क्यांची वाढ होत आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी व शेतमजूर पूर्णपणे कोलमडला आहे. वीज ही मानवी जीवनाची मूलभूत गरज असताना वीज कंपन्या व सरकार युनिट दर १५ पैशांवरून थेट १५ रुपयांपर्यंत वाढवत आहेत. ग्राहकांची ऊसासारखी पिळवणूक होत असल्याची संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या जाचक धोरणाचा निषेध करत आंदोलकांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांची भेट घेतली. त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनामध्ये स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा. शंका असेल तर आहे त्याच मीटरची तांत्रिक तपासणी करा. पंजाब व तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर स्मार्ट मीटर न बसवण्याचा अधिकृत निर्णय घ्या. वीज दरवाढ मागे घ्या. २४ तास वीज पुरवठा करा. कृषी पंपांसाठी सोलरची सक्ती मागे घ्या. शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवा. निवडणुकीत एन.डी.ए.ने घोषणा केल्याप्रमाणे २०० युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करा. या मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात किसान सभा व शेतमजूर युनियनचे प्रकाश सोनोने, चंद्रकांत वडस्कर, राजाभाऊ बाभुळकर, मनोहर वाढोणकर, जितेंद्र कोरडे, सलीम खॉ, देवेंद्र बावणे, अंबादास जुवारे, दिलीप गोहत्रे, संजय गोरडे, सुरेश राउत, श्रीकृष्ण लांजेवार, निरंजन बेले, विलास हांडे, सुरेश ढोरे, राहुल ढोरे, सचिन बारवाल, अशोक भेलकर, प्रवीण घुरडे, नथ्युजी फरकाळे, दिलीपसिंह नाहटा, तस्लीमा बेग, अरून सुने, अनिकेत खुळे, दिनेश लिलव्हे, सय्यद आशिक, सयरा परविन, गुलखॉ, सरफोदीन काजी, शेख आरीफ तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा महासचिव सागर भवते, प्रशांत काबळे, मनिष खरे, मिलींद यावले यांच्यासह अनेक वीज ग्राहक सहभागी झाले होते.जुने मीटर बदलून सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा शासनाने लावला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर