हिंगोली शहरासह जिल्हाभरात होळी व धूलिवंदनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात होळी व धूलिवंदनाचा सण उत्साहात व शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिस दलाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामीण भागातून बेकायदेशीर रित्या गावठी दारू गाळप व विक्री होणार नाही याकडे लक्ष दिले जाणार आहे. याशिवाय देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. वाहनांच्या तपासणीसाठी जिल्ह्यातील १३ पोलिस ठाणे अंतर्गत विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेची चार पथकेही कार्यरत असणार आहेत. या पथकाच्या माध्यमातून चार चाकी, दुचाकी वाहनांसह ऑटोची तपासणी केली जाणार असून दारूची वाहतूक करणारी वाहने जप्त करून चालकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यासाठी रविवार ता एक पासून वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे. हिंगोली शहरात वाहतूक शाखेच्या वतीने वाहन तपासणी केली जाईल. शहरासह जिल्ह्यात मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या संदर्भातील स्पष्ट आदेश जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. संवेदनशील भागामध्ये पोलिस विभागाची गस्त राहणार आहे. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत विशेष दक्षता घेण्यात आली आहे. तर मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी वाहन चालकांची ब्रिथ ऍनालायझर द्वारे तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ग्रामीण भागांमधून होणाऱ्या पार्ट्यांवरही लक्ष ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनीही होळी व धुलीवंदनाचा सण उत्साहात व शांततेत साजरा करावा तसेच धुलीवंदनाच्या दिवशी नैसर्गिक रंगाचा वापर करावा असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी केले.
पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांचा इशारा:धूलिवंदनाच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार
-
By सुरेश पाचभाई
- February 28, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीसाठी SOP च नाही:मुख्यमंत्र्यांची कबुली;...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 28, 2026
अजितदादा सदैव आपल्या स्मरणात:’जिवाभावाची माणूस’ म्हणत सुनेत्रा...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 28, 2026
रोहित पवारांची सादरीकरणाद्वारे दोषींनाच मदत:मंत्री अनिल पाटील...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 28, 2026
विधिमंडळ कामकाज:ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीसाठी SOP च नाही,...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 28, 2026
बंजारा समाजाचा ST मध्ये समावेश होणार का?:हायकोर्टाच्या...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 28, 2026
