त्र्यंबकेश्वर – रोपवेने 3 तासांचे अंतर 11 मिनिटांत पार:पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे 550 कोटींचा प्रकल्प रखडला होता

त्र्यंबकेश्वर येथे अंजनेरीजवळील पेगलवाडी ते ब्रह्मगिरीदरम्यान ३.९३६ किमी लांबीच्या रोपवेच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे ३ तासांचे अंतर आता अवघ्या ११ मिनिटांत कापता येईल. यासोबतच वृद्ध व लहान मुलांसाठीही गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे. प्रशासन हा प्रकल्प सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न करत अाहे. त्यासाठी भूसंपादन परस्पर संमतीने व थेट खरेदीतून केले जात आहे. विशेष म्हणजे गिधाडांच्या अधिवास,पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे अडकलेल्या या रोपवे प्रकल्पाला आता हिरवा कंदील मिळाला आहे. गिधाडांचे क्षेत्र सुरक्षित राखून आता पेगलवाडी ते ब्रह्मगिरी असा रोपवे तयार केला जाईल.‘बर्नार्ड’ नावाच्या खासगी कंपनीमार्फत या प्रकल्पाचे काम केले जात आहे. जमीनमालकांना थेट खरेदीसाठी नोटिसा बजावल्या. १५ दिवसांत हरकती मागवल्या आहेत. सिंहस्थ कुंभापूर्वीचे लक्ष्य

Leave a Comment

error: Content is protected !!