Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अजितदादांचा ‘सुनियोजित मर्डर’:तपास यंत्रणांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? विकास लवांडे यांचा खळबळजनक आरोप

अजित पवार यांच्या निधनाला एक महिना उलटत असतानाच, आता एका धक्कादायक विधानाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अजितदादांचा झालेला मृत्यू हा निव्वळ अपघात नसून तो एक सुनियोजित मर्डर आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा अंत झाला. या घटनेला महिना उलटला तरी संशयाचे धुके कायम आहे. विकास लवांडे यांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून शासन आणि तपास यंत्रणांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. विकास लवांडे पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवारांचा विमान अपघात प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहे, अजितदादा हे कुणाचा तरी मोठा राजकीय अडथळा बनलेले असावेत, असे खळबळजनक ट्विट लवांडे यांनी केले आहे. नेमके लवांडेंचे ट्विट काय? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे म्हणाले की, शासनाची व चौकशी करणाऱ्या यंत्रणांची भूमिका पाहता आदरणीय अजितदादांचा सुनियोजित मर्डर झालेला आहे यावर माझे ठाम मत बनलेले आहे. सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहे. कारण अजितदादा हे कुणाचा तरी मोठा राजकीय अडथळा बनलेले असावेत. इतिहास तपासला तर अनेक प्रकरणे दडपली आहेत हे लक्षात येईल, असे ट्विट करत म्हटले आहे.

तपास अधिकाऱ्याचे नाव गायब; रोहित पवारांचा संशय दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघाती निधनाला एक महिना उलटला आहे. डीजीसीएच्या अहवालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावे केले आहेत. विमान अपघातापूर्वी घटनास्थळाची ‘रेकी’ झाली होती,” असा धक्कादायक आरोप करत रोहित पवारांनी या संपूर्ण प्रकरणाची ‘क्रिमिनल अँगल’ने चौकशी करण्याची मागणी केली आहे. VSR कंपनीच्या विमानाचा 2023 मध्ये जेव्हा अपघात झाला होता, तेव्हा तपास अधिकाऱ्याचे नाव अहवालात स्पष्ट नमूद होते. मात्र, अजितदादांच्या निधनाशी संबंधित अहवालात कोणत्याही तपास अधिकाऱ्याचे नाव का नाही? कदाचित या प्रकरणात कागदपत्रांची हेराफेरी होणार आहे, हे माहिती असल्यानेच अधिकाऱ्यांनी आपले नाव दिले नसावे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, अपघातापूर्वी तिथे काही संशयास्पद लोक आले होते. त्यांनी त्या परिसराची रेकी केल्याचे बोलले जात आहे. आम्हाला याची पक्की माहिती नसली तरी, सीआयडी आणि सीबीआयने या दिशेने तपास करणे अत्यंत गरजेचे आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!