ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

गडकरींचे टाटांना पत्र:नागपूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी, एअर इंडियाने फेऱ्या रद्द केल्याने औद्योगिक विकासावर परिणाम

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र लिहून नागपूर-मुंबई विमानसेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. एअर इंडियाने नागपूरहून मुंबईसाठीच्या विमानांची संख्या कमी केल्याने आणि काही फेऱ्या रद्द केल्याने विदर्भाच्या औद्योगिक विकासाला बाधा येत असल्याचे गडकरींनी पत्रात म्हटले आहे. नागपूर येथील ‘असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट’ या संस्थेने विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत गडकरींकडे दाद मागितली होती. या मागणीची गंभीर दखल घेत गडकरींनी थेट टाटा समूहाच्या प्रमुखांना पत्र पाठवले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, विदर्भातील व्यापार, उद्योग, गुंतवणूक आणि प्रशासकीय कामकाजासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे या मार्गावरील विमाने रद्द केल्याने व्यावसायिक प्रवास आणि प्रवाशांच्या सोयींवर प्रतिकूल परिणाम होत असल्याची भीती त्यांनी पत्रात व्यक्त केली. गडकरींनी पत्रात नागपूरच्या ऐतिहासिक महत्त्वाचाही उल्लेख केला. सुमारे १०० वर्षांपूर्वी टाटांच्याच मालकीखाली सुरू झालेल्या ‘नाईट एअर मेल सर्व्हिस’चे नागपूर हेच मुख्य केंद्र होते. तसेच, केंद्र सरकारने नुकतीच पीपीपी तत्त्वावर नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरणाची जबाबदारी जीएमआर समूहाकडे सोपवण्यास मंजुरी दिली आहे, ज्यामुळे नागपूर देशातील एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र म्हणून विकसित होत आहे. या सर्व बाबींचा आणि विमान प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करता, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी एअर इंडियाने नागपूर-मुंबई दरम्यानची किमान एक सकाळ किंवा संध्याकाळची विमान फेरी तातडीने पूर्ववत करणे आवश्यक आहे. चंद्रशेखरन यांनी या प्रकरणात तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी विनंती गडकरींनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर