विधिमंडळ कामकाज:महाराष्ट्र वेगळा देश असता तर जगातील तिसावी मोठी अर्थव्यवस्था ठरला असता, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा

राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विधिमंडळाच्या सभागृहात आज अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा आणि मतदानाच्या प्रक्रियेचा पहिला दिवस सुरू होत आहे. सरकारने सादर केलेल्या विविध विभागांच्या निधी मागण्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मागण्यांवर चर्चा करताना विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील, तर सत्ताधारी आपली भूमिका ठामपणे मांडण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे आजचे विधिमंडळातील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहूया विधिमंडळ कामकाजाशी संबंधित बातम्या…

Leave a Comment

error: Content is protected !!