ब्रेकिंग न्यूज
पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख…
SP News Maregaon

विरोधकांना कमी लेखू नका:विधिमंडळातील गैरहजेरीवर भाजपचा इशारा; दांडीबहाद्दर आमदारांना चव्हाणांचा दम

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांच्या विधीमंडळातील वाढत्या गैरहजेरीवरून पक्षाने आता कडक भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आमदार आणि मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. विरोधकांना कमी लेखून निष्काळजीपणे वागू नका आणि सभागृहातील कामकाज गांभीर्याने घ्या, असा संदेश त्यांनी दिला आहे. तसेच विधिमंडळात वारंवार गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करून ते संबंधितांच्या हातात देण्यात आल्याचीही माहिती आहे. यापुढे कोणताही आमदार किंवा मंत्री सभागृहात अनुपस्थित राहणार असेल, तर त्याला त्याचे लेखी कारण पक्षाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनाकारण गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मंत्र्यांच्या उपस्थितीवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे आमदार आणि मंत्र्यांना आता सभागृहातील कामकाजाकडे अधिक गांभीर्याने पाहावे लागणार आहे. भाजपने यासाठी नवीन पद्धत लागू केली आहे. सभागृहाचे कामकाज सकाळी सुरू झाल्यापासून सायंकाळपर्यंत सर्व आमदार आणि मंत्र्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असेल. यासाठी पाच आमदारांचा एक गट तयार करण्यात आला आहे. त्या गटातील एका आमदाराकडे उपस्थिती आणि कामकाजात सहभाग याची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित आमदार आपल्या गटातील सदस्य सभागृहात किती वेळ उपस्थित राहतात आणि कितपत सक्रिय असतात याचा अहवाल थेट प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे देणार आहे. योग्य आणि लेखी कारण पक्षाला कळवावे लागेल दरम्यान, जर एखाद्या आमदार किंवा मंत्र्याला महत्त्वाच्या बैठकीसाठी किंवा अन्य कारणासाठी सभागृहातून अनुपस्थित राहावे लागले, तर त्याबाबत योग्य आणि लेखी कारण पक्षाला कळवावे लागेल. कोणतीही माहिती न देता अनुपस्थित राहिल्यास संबंधित आमदारावर पक्षाकडून कारवाई होणार आहे. तसेच मंत्र्यांच्या बाबतीत संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील योग्य ती कार्यवाही करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपने घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे आता विधिमंडळातील उपस्थितीबाबत आमदार-मंत्र्यांवर अधिक जबाबदारी येणार असल्याचे मानले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर