भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांच्या विधीमंडळातील वाढत्या गैरहजेरीवरून पक्षाने आता कडक भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आमदार आणि मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. विरोधकांना कमी लेखून निष्काळजीपणे वागू नका आणि सभागृहातील कामकाज गांभीर्याने घ्या, असा संदेश त्यांनी दिला आहे. तसेच विधिमंडळात वारंवार गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करून ते संबंधितांच्या हातात देण्यात आल्याचीही माहिती आहे. यापुढे कोणताही आमदार किंवा मंत्री सभागृहात अनुपस्थित राहणार असेल, तर त्याला त्याचे लेखी कारण पक्षाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनाकारण गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मंत्र्यांच्या उपस्थितीवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे आमदार आणि मंत्र्यांना आता सभागृहातील कामकाजाकडे अधिक गांभीर्याने पाहावे लागणार आहे. भाजपने यासाठी नवीन पद्धत लागू केली आहे. सभागृहाचे कामकाज सकाळी सुरू झाल्यापासून सायंकाळपर्यंत सर्व आमदार आणि मंत्र्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असेल. यासाठी पाच आमदारांचा एक गट तयार करण्यात आला आहे. त्या गटातील एका आमदाराकडे उपस्थिती आणि कामकाजात सहभाग याची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित आमदार आपल्या गटातील सदस्य सभागृहात किती वेळ उपस्थित राहतात आणि कितपत सक्रिय असतात याचा अहवाल थेट प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे देणार आहे. योग्य आणि लेखी कारण पक्षाला कळवावे लागेल दरम्यान, जर एखाद्या आमदार किंवा मंत्र्याला महत्त्वाच्या बैठकीसाठी किंवा अन्य कारणासाठी सभागृहातून अनुपस्थित राहावे लागले, तर त्याबाबत योग्य आणि लेखी कारण पक्षाला कळवावे लागेल. कोणतीही माहिती न देता अनुपस्थित राहिल्यास संबंधित आमदारावर पक्षाकडून कारवाई होणार आहे. तसेच मंत्र्यांच्या बाबतीत संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील योग्य ती कार्यवाही करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपने घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे आता विधिमंडळातील उपस्थितीबाबत आमदार-मंत्र्यांवर अधिक जबाबदारी येणार असल्याचे मानले जात आहे.
विरोधकांना कमी लेखू नका:विधिमंडळातील गैरहजेरीवर भाजपचा इशारा; दांडीबहाद्दर आमदारांना चव्हाणांचा दम
-
By सुरेश पाचभाई
- March 12, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
महाराष्ट्रात गॅस टंचाई!:अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या सिलिंडरसाठी रांगा,...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 12, 2026
गॅस टंचाईच्या सावटात राज्यात प्रशासनाचे धाडसत्र!:पंढरपूर आणि...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 12, 2026
विमा क्लेम मंजुरीतील अडचणी दूर करा:रुग्ण ‘केंद्रबिंदू’...
6views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 12, 2026
एकीकडे कडाक्याची उष्णता, दुसरीकडे राज्यात पावसाचा इशारा:14...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 12, 2026
फडणवीसांच्या नेतृत्वात मुंबई सुरक्षित:मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहण्याची...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 12, 2026
महाराष्ट्राच्या शिल्पकाराला वंदन:यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अजित...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 12, 2026
