ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचे निधन:पुण्यात अल्पशा आजाराने घेतला शेवटचा श्वास; संवेदनशील आणि प्रगल्भ आवाज हरपला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचे (वय 77) पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील आणि प्रगल्भ आवाज हरपला आहे. मराठी आणि हिंदीतून काव्यलेखन, अनुवाद, ललित लेखन आदी साहित्याच्या कलाप्रकारातून त्यांनी मुशाफिरी केली. आसावरी काकडे जन्म 23 जानेवारी 1949 चा. बी.कॉम.नंतर मराठी आणि तत्त्वज्ञान या दोन विषयांत एम.ए. केले. त्यानंतर त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या त्यांच्या लिखाणाबद्दल राज्य शासनाच्या पुरस्कारासह त्यांना साहित्य अकादमीने अनुवादासाठी पुरस्कार देऊन गौरविले होते. आसावरी काकडे यांचे ‘आरसा’, ‘आकाश’, ‘लाहो’, ‘मी एक दर्शनबिंदू’, ‘रहाटाला पुन्हा गती दिलीय मी’, ‘स्त्री असण्याचा अर्थ’, ‘उत्तरार्ध’, ‘व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर’, ‘भेटे नवी राई’ आणि ‘नव्या पर्वाच्या प्रतीक्षेत’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध होते. त्यांनी लहानग्यांसाठी गाणी लिहिली. त्यांचे पाच बालगीतसंग्रह प्रसिद्ध होते. त्यात ‘टिक टॉक ट्रिंग’, ‘अनु मनु शिरू’, ‘जंगल जंगल जंगलात काय?’, ‘भिंगोऱ्या भिंग’ आणि ‘ऋतुचक्र’ या पुस्तकांचा समावेश होता. आसावरी काकडे यांनी गद्यलेखनही केले. त्यांची ‘कवितेभोवतीचं अवकाश’, ‘ईशावास्यम् इदं सर्वम्ः एक आकलन-प्रवास’, ‘अथांग’ (अनुवाद), ‘आनंदी गोपाळ’ (श्री. ज. जोशी यांच्या कादंबरीचे मुलांसाटी संक्षिप्तीकरण), ‘मी माझ्या डायरीतून’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी ‘मौन क्षणों का अनुवाद’, ‘इसीलिए शायद’ आणि ‘मेरे हिस्से की यात्रा’ या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी हिंदीतूनही लेखन केले. आसावरी काकडे यांनी केलेले अनुवादही लोकप्रिय ठरले. चंद्रप्रकाश देवल यांच्या ‘बोलो माधवी’ या कवितासंग्रहाचा त्यांनी ‘बोल माधवी’ असा मराठीतून अनुवाद केला. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक कवितांचा अनुवाद ‘तरीही काही बाकी राहील’ या कवितासंग्रहातून प्रसिद्ध झाला. तर दीप्ती नवल यांच्या ‘लम्हा लम्हा’ या कवितासंग्रहाचा आणि डॉ. दामोदर खडसे यांच्या ‘तुम लिखो कविता’ या कवितासंग्रहाचा ‘तू लिही कविता’ या नावाने त्यांनी मराठीत अनुवाद केला. त्यांच्या अनुवादाचेही रसिकांनी उत्तम स्वागत केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर