ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

सुनेत्रा पवारांच्या विमानात तांत्रिक बिघाड:सुप्रिया सुळेंकडून चिंता व्यक्त, म्हणाल्या – असे झाले असेल तर हा चिंताजनक विषय

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिजीत दिपके यांच्यातील कथित भेट तसेच सुनेत्रा पवार यांच्या विमान प्रवासादरम्यान झालेला तांत्रिक बिघाड, या दोन्ही चर्चिलेल्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “सुनेत्रा वहिनींनी प्रवास केलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती जर खरी असेल, तर मला नक्कीच वहिनींची, पार्थची आणि तटकरेंची काळजी वाटते,” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी कौटुंबिक संवेदनशीलता दाखवली. तसेच संजय राऊतांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्याची आपण स्वतः फोन करून माहिती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुंबईहून दिल्लीला जाताना ‘व्हीएसआर ऑपरेटिंग कंपनी’च्या विमानाने प्रवास केल्याचे वृत्त समोर आले होते. या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाणाला दोन तास उशीर झाला होता. भूतकाळात अजित पवार यांचा याच कंपनीच्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर माध्यमप्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या: “सुनेत्रा वहिनी खरंच त्या विमानाने गेल्या होत्या की नाही, याची मला पूर्ण कल्पना नाही. पण जर असे झाले असेल आणि विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला असेल, तर तो अत्यंत चिंताजनक विषय आहे. मी नेहमीच कोणत्याही प्रवास साधनाच्या सुरक्षेबद्दल संसदेत सातत्याने आवाज उठवत असते. त्यामुळे मला वहिनींची आणि सोबत असलेल्यांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे.” सुप्रिया सुळे म्हणाल्या, “व्हीएसआर कंपनीबद्दल आरोपप्रत्यारोप होत राहतात. पण दोन-तीन महत्त्वाचे मु्द्दे आहेत. सुनेत्रा वहिनी खरंच त्या विमानाने गेल्यात की नाही मला माहिती नाही. कारण पंतप्रधान मोदींनी कमी खर्चाचे आवाहन केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार अजुनही खासगी विमानाने किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करते की नाही याची माहिती नाही,” अजितदादांच्या अपघाताबद्दल अजुनही उत्तरे नाहीत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “खासगी विमान, हेलिकॉप्टर यांच्या मेन्टेनन्सचा वारंवार तपासणी करणे आवश्यक आहे. अजितदादांच्या ज्याप्रकारे अपघात झाला, त्याची अनेक उत्तरे अजुनही आमच्याकडे नाहीयेत. एक बहीण म्हणून त्याची उत्तरे मला हवी आहेत. आज नाही उद्या पण उत्तरे हवी आहेत. ही उत्तरे आम्ही संसदेत नेहमी मागतो. कारण अजितदादा माझा फक्त भाऊ नव्हता, तर या राज्याचा उपमुख्यमंत्री होता. विमानाच्या मेन्टेनन्सचा प्रॉब्लेम होता का? असेल तर त्याला जबाबदार कोण? याची उत्तरे द्यावीच लागतील. आज माझा भाऊ गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरावर असा दिवस येऊ नये.” महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातून पुन्हा ३४४ कोटी रुपयांचा निधी वळवण्या आल्याची माहिती समोर आलेली आहे. याआधीही सामाजिक न्यायविभागाचा निधी वळवण्यात आला होता. आता ही दुसरी वेळ आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, “माध्यमांमधून सातत्याने अशी माहिती मिळतेय की, सर्व शिक्षा अभियानाचा आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जातो. हे अतिशय चिंताजनक आहे. ही गोष्ट मी आज नाही, तर गेले दोन अडीच वर्षापासून म्हणतेय की, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे.” “राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व अर्थतज्ज्ञांना बोलवा. त्यांचे मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्राचे आर्थिक धोरण ठरवले गेले पाहिजे. देशातील आर्थिक परिस्थिती देखील अतिशय अडचणीत आहे. मी वारंवार पंतप्रधानांना विनंत केली की, सर्व पक्षीय बैठक बोलवा आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा करूया. कारण देश टिकला, तरच बाकी सगळे टिकतील.” अभिजीत दिपके आणि मोदी भेटीच्या दाव्यावर राऊतांना फोन करणार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ‘अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट झाली होती’ असा एक मोठा दावा केला होता. या दाव्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली ही माहिती मी देखील ऐकली आहे. या प्रकरणाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, नक्की काय घडले किंवा त्यांना कोणी काय माहिती पुरवली, या संदर्भात मी स्वतः संजय राऊत यांना फोन करणार आहे आणि त्यांच्याकडून या विषयाची सविस्तर माहिती घेणार आहे.”

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर