धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे जर मुस्लीमांना त्रास होणार असेल तर तो हिंदूंना, बौद्धांना,जैन, पारशी, शीख आणि ख्रिश्चनांनादेखील होईल, अन् होणार नसेल तर कोणालाही होणार नाही, पण कालचे बिले हे सर्व धर्मांना त्रास देणारे आहे असे उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. भास्कर जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडले आणि त्याचबरोबर शिवसेनेची भूमिका म्हणून मी त्यालार पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेची भूमिका म्हणून आम्ही त्यांचे समर्थन केले आहे, त्यातून सरकारची लबाडी आमच्या तात्काळ लक्षात आली होती. आमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही ती तात्काळ लक्षात आली. बाहेर चर्चा करताना सत्ताधाऱ्यांचे उथळ वक्तव्य करणारे काही लोकं पाळले गेले आहेत त्यांच्याकडून हे मुस्लीमांच्याविरोधात आणि हिंदूच्या रक्षण करणारे विधेयक आहे अशा चर्चा घडवल्या जात होत्या. प्रत्यक्षात बिलामध्ये कुठेही तसे काहीही नाही. त्यामुळे राडा करायला संधी मिळाली भास्कर जाधव म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांकडून काल एक शब्द चुकीचा गेला तो जायला नको होता. त्याचे मी समर्थन करणार नाही. त्यांना त्यांचवेळी मी माफी मागायला सांगत होतो पण सत्ताधारी पक्षाला जे अपेक्षित होते, त्यांना या बिलच्या माध्यमातून सभागृहात हिंदू-मुस्लीम प्रकारची राडेबाजी करायची होती, ते करायला संधी मिळाली. जितेंद्र आव्हाडांच्या एका वाक्यामुळे सत्ताधाऱ्यांना सभागृहात राडा घालायला संधी मिळाली हे खरे आहे. त्यामुळे समाजात मोठा राडा होऊ शकतो भास्कर जाधव म्हणाले की, अबु आझमी या बिलाबद्दल काय म्हणता यावर बोलणे मला काही महत्त्वाचे वाटत नाही. पण या बिलामुळे टार्गेट झाले तर सर्वच धर्म टार्गेट होतील, नाहीतर कुणीच टार्गेट होणार नाही. दोन धर्मातील मुले-मुली लग्न करू इच्छित असतील तर त्यांना 60 दिवस आधी अधिकाऱ्याला सांगावे लागेल. असे लग्न लपवाछपवी करत होत असतात. यामुळे समाजात मोठा राडा होऊ शकतो, हे एका धर्मासाठी नाही तर सर्वच धर्मांसाठी त्रासदायक होऊ शकते.
बाहेर हिंदू-मुस्लिम चर्चा, पण बिलात काहीच नाही:विधेयकाचा एका धर्माला त्रास झाला तर सर्वांनाच होणार- भास्कर जाधव
-
By सुरेश पाचभाई
- March 17, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचे निधन:पुण्यात अल्पशा...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 17, 2026
एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी मेगाभरती:8300 नवीन...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 17, 2026
एकनाथ शिंदेंची पंतप्रधान मोदींसोबत दीड तास चर्चा:म्हणाले...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 17, 2026
राज्यात ६ हजारांहून अधिक प्राध्यापक भरती:विद्यापीठांना ७००,...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 17, 2026
गडचिरोलीत तांदूळ व्यापाऱ्याकडून कोट्यवधींची वसुली:नाना पटोले यांचा...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 17, 2026
विधिमंडळ कामकाज:तांदूळ व्यापाऱ्याची राईस मिलर्सकडून कोट्यवधींची वसुली...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 17, 2026
