राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्यामागे उबाठा खासदारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटातील जवळपास निम्माहून अधिक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत हालचालींना वेग आला आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आगामी रणनीतीवर चर्चा केली आहे. या भेटीचा मुख्य अजेंडा ठाकरे गटाच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेश हाच असल्याचे बोलले जात आहे. संसदेत आपले संख्याबळ वाढवणे आणि संघटनात्मक मजबुतीसाठी शिंदेंनी हे विशेष मिशन हाती घेतल्याचे बोलले जात आहे.केवळ चर्चाच नव्हे, तर शिंदेंनी या खासदारांच्या नावांची यादी तपासून कायदेशीर तज्ज्ञांशीही सल्लामसलत केली आहे, जेणेकरून पक्षांतराच्या वेळी कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, या चर्चेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. आमचे निष्ठावान लोकप्रतिनिधी कुठेही जाणार नाहीत. ज्यांनी घोटाळे केले आहेत, तेच ईडी-सीबीआयच्या भीतीने तिकडे गेले आहेत. आमच्या खासदारांना विकासनिधी दिला जात नसल्याने अडवणूक केली जात आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. ठाकरे गटाचे ‘हे’ 9 खासदार रडारवर जर हे पक्षांतर झाले, तर ठाकरे गटाला लोकसभेत मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे 2024 मध्ये 9 खासदार निवडून आले आहेत. अरविंद सावंत (दक्षिण मुंबई),अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई),संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई),संजय जाधव (परभणी),ओमराजे निंबाळकर (धाराशिव),भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), राजाभाऊ वाजे (नाशिक), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), नागेश पाटील-आष्टीकर (हिंगोली) यापैकी नेमके कोणते खासदार शिंदेंच्या रडारवर आहेत हे नेमके समोर आलेले नाही. शिंदे सेनेचे हे खासदार आलेत निवडून डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (कल्याण), नरेश गणपत म्हस्के(ठाणे), रवींद्र दत्ताराम वायकर (मुंबई उत्तर पश्चिम), श्रीरंग अप्पा चंदू बारणे (मावळ), प्रतापराव गणपतराव जाधव – (बुलढाणा) संदीपनराव आसाराम भुमरे –(संभाजीनगर),धैर्यशील संभाजीराव माने(हातकणंगले), हे खासदार शिंदेंच्या नेतृत्वात निवडून आले आहेत. जर उबाठाचे खासदार शिंदेंसोबत आले तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची दिल्लीत ताकद वाढू शकते.
