भोंदू बाबा अशोक खरातनंतर आता संजूबाबा राऊत ने नवा धंदा उघडला आहे. जसा खरात लोकांना फसवायचा तसे राऊत भविष्यवाणी सांगत लोकांना फसवण्याचे काम करत आहे.कोणाचा पक्ष भाजपमध्ये विलीन होईल आणि कोण कुठे जाईल हे सांगण्याच्या भानगडीत राऊत यांनी जाऊ नये, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्यांची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वेगळे अस्तित्व आहे ते लोकांमधून निवडून आलेले आहेत. खरात सारखे संजूबाबा राऊत हे दुसरे दुकान मांडत आहेत. नवनाथ बन म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची याचा निकाल जनतेने विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकीतून दिला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी सुनेत्रा अजित पवारांची आहे यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आता कोर्ट काय निर्णय देईल तो नक्की देईल. उबाठा गटाचा शिवसेनेवर आणि धनुष्यबाणावर हक्क उरला नाही हे आता सिद्ध झाले आहे. तुम्ही हरामशास्त्री अन् कामशास्त्री नवनाथ बन म्हणाले की, कोण रामशास्त्री आहे आणि कोण कामशास्त्री आहेत हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊतांनी पडू नये. कारण संजय राऊत आणि उबाठा गट स्वत: हरामशास्त्री आहेत. कामशास्त्रांत तर त्यांची पीएचडी झाली आहे. अलिबागच्या बंगल्यात तुम्ही काय पीएचडी करता हे जनतेने पाहिले आहे. तिथले काळे कारनामे समोर आले तर तुम्हाला जनतेच्या समोर जाता येणार नाही. तुम्ही हरामशास्त्री आणि कामशास्त्री आहात. .. काँग्रेसच्या उपकारावर आमदारकी नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी विधीमंडळात जावे असे संजय राऊत यांना वाटते आहे. पण जनतेने तुम्हाला नाकारले आहे. उद्धव ठाकरे विधीमंडळात जाणार का नाही, त्यांना संधी मिळणार का नाही हे तुमच्या हातात नाही तर काँग्रेस ठरवणार आहे. काँग्रेसने उपकार केले त्यांनी आशीर्वाद दिले तरच उद्धव ठाकरेंना विधीमंडळात जाता येणार आहे. एक काळ होता शिवसेनेला स्वाभिमान होता. आता आमदारकीसाठी सोनिया गांधीसमोर मुजरा करावा लागणार आहे. ..देवाभाऊंनी काय बोलावे हे राऊतांनी सांगू नये नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी काय बोलावे हे संजय राऊत यांनी सांगू नये. शिवरायांच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्या माणसांनी दुसऱ्यांना काही सल्ले देऊ नये. सौदेबाजीची भाषा तर तुम्ही करूच नये. कारण तुम्ही सौदेबाजी करत पक्ष काँग्रेसला विकला, हिंदूत्व सोडले. यामध्ये राऊतांना राज्यसभेची पुन्हा संधी मिळावी हे तुमचे डील राहुल गांधीसोबत सुरू आहे. देवाभाऊ जनतेमधून निवडून आले आहेत, ते मागच्या दाराने राजकारण करत नाही. त्यांनी काय बोलावे हे राऊतांनी सांगायची गरज नाही.
