अवकाळीग्रस्तांना दिलासा!:पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

मराठावाडा, विदर्भ आणि राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. सर्वेक्षण करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून सर्व बाजूने योग्य तपास सुरू आहे. पोलिसांकडे जी माहिती येते आहे त्या आधारावर पोलिस काम करत आहे. कोणाकडे अजून काही माहिती असेल त्यांनी जर ती पोलिसांना दिली तर तपासाला चालना मिळेल. या प्रकरणी संपूर्ण चौकशी पारदर्शकपणे सुरू आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कोणालाही सोडणार नाही असे सांगितले आहे. खरात प्रकरणी चौकशी सुरू चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, खरात प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू आहे. त्यांना जे जमीनीचे गैरव्यवहार दिसून येतील त्यानंतर त्यावर आम्ही चौकशी करू. पोलिस तपास सुरू असताना दुसऱ्या चौकशा लावणे योग्य नाही. यापुढे कोणाला गैरफायदा घेता येणार नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचा काही लोकांनी गैरफायदा घेतला असेल तर शासन ते शोधून काढते. नंतर मात्र त्यांना लाभ होणार नाही. काही लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतला तसा घ्यायला नको होता पण यापुढे त्यांना लाभ मिळणार नाही. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील गोष्टींबद्दल मला काही माहिती नाही, असे म्हणत त्यांनी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रावर बोलणं टाळले. राहुल गांधींवर टीका राहुल गांधी यांना ‘वंदे मातरम’चा नेमका अर्थही माहित नाही. त्यांनी हे राष्ट्रगीत कधी मनापासून वाचले नाही आणि समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. वस्तुस्थिती तर अशी आहे की, त्यांना ‘वंदे मातरम’च्या चार ओळीही नीट म्हणता येत नाहीत, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर राष्ट्रभक्तीच्या मुद्द्यावरून तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!