अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी तातडीने या प्रकरणी संवेदना व्यक्त करणे गरजेचे होते. त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली नाही. शेतकऱ्यांना खूप हाल सहन करावे लागत आहेत. जळगावमधील जे लोकं सत्तेत आहे त्यांच्या संवेदना ठार मेलेल्या आहेत, ते 24 तास राजकारण करतात, संकटमोचक गिरीश महाजन शेतकऱ्यांवर संकट आल्यावर कुठे असतात असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, बारामतीमध्ये कौटुंबिक कारणास्तव शरद पवार यांचा पक्ष कदाचित निवडणूक लढणार नाही, पण इतरांना निवडणूक लढवू नये असे सांगू नये. ही लोकशाही आहे, त्यावर एकत्र बसत निर्णय घ्यावा लागेल. मविआतील नेते एकत्र बसून या दोन्ही जागा संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. शिवसेनेने राहुरीत लढावे असे आमचे कार्यकर्ते सुद्धा म्हणत आहे. भाजपला मदत होईल असे निर्णय घेऊ नये ही आमची भूमिका आहे. महाजन केवळ राजकीय संकटमोचकाचे काम करतात का? संजय राऊत म्हणाले की, संकटमोचन हे केवळ राजकीय संकटमोचकाचे काम करतात का? शेतकऱ्यांवर जेव्हा संकट येतात तेव्हा हे काही काम करताना दिसत नाही. केवळ पक्ष फोडणे, आमदार, नगरसेवक पळवणे हे त्यांचे कर्तव्य आहे का? हे राज्याचे दुर्दैव आहे. जळगाव जिल्ह्यात राजकीय हुकुमशाही संजय राऊत म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात राजकीय हुकुमशाही सुरू आहे. पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी सुरू आहे, पोलिसांनी स्वत:ला वर्दीतील गुंड समजू नये. जळगावमध्ये पोलिस गणवेशातील हुकुमशाही आहे, त्याचा वापर राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी करत असतात. हळूहळू तुमचाही जोर ओसरणार आहे. शिंदे गटाचे आमदार हे संकटमोचकाच्या संपर्कात आहेत ते पुढची निवडणूक भजपमधून लढवतील असे वाटते. तिन्ही पक्षाने एकत्र निर्णय घ्यावा संजय राऊत म्हणाले की, राहुरी आणि बारामतीमध्ये पोटनिवडणूक आहे. मविआ म्हणून आपण निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चांगल्या प्रकारे ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीवर चर्चा होते, काँग्रेस अनेक ठिकाणी सर्वांत आधी निवडणूक लढवण्यासाठी पुढे जाते निकालानंतर कळते आपण कुठे आहोत. जिथे ज्या पक्षाची ताकद आहे त्याच पक्षाने निवडणूक लढवावी. मविआतील तिन्ही पक्षांनी एकत्र येत निवडणुकीचा विचार केला पाहिजे.
संकटमोचक केवळ राजकारणापुरतेच का?:शेतकऱ्यांच्या संकटात गिरीश महाजन कुठे आहेत? जळगावात पोलिसांच्या मदतीने राजकीय हुकूमशाही- संजय राऊत
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
पात्र नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देणार:त्यांचा सक्रीय...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
पिंपरी बुद्रक वाळू घाटावर उत्खनन:कंत्राटदाराला ८५ लाखांच्या...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
लातूर हादरलं! क्लबमध्ये घुसून बंदुकीचा धडाका, तलवारींचा...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
‘मनाचे श्लोक’चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर परिणाम दिसतो:ठाकरे...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
नीलम गोऱ्हेंनी घेतली भोंदू खरातची भेट:सामाजिक कार्यकर्त्या...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
अशोक खरातकडे स्वेच्छेने गेलेल्या महिलांवर कारवाई करा:लेखिका...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
