Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

सुनेत्रा पवारांनी दोनदा फोन करून बिनविरोधसाठी विनंती केली:देवेंद्र फडणवीस म्हणजे झारीतले शुक्राचार्य, निवडणूक लढायला आम्ही सक्षम- हर्षवर्धन सपकाळ

बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी दोन वेळा फोन करत संपर्क साधला आणि बिनविरोध निवडणुकीची विनंती केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. आपण सभ्यतेने वाटचाल केली पाहिजे असे या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रयत्न करतो आहोत. आमची भूमिका ही सर्वांना माहिती आहे. सत्ताधाऱ्यांनी तसा प्रतिसाद दिलेला नाही. बारामती निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण जी विनंती सुरू आहे, त्यासाठी आम्ही चर्चा करतो आहोत. बारामतीमध्ये काँग्रेस संदर्भात बोटं दाखवणे चुकीचे तिथे 53 अर्ज दाखल झाले आहेत. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादीअजित पवार गटातील नेत्यांनी या निवडणुकीसंदर्भात आमच्याशी संपर्क इतक्यादिवस का साधला नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांना या निवडणुकीसंदर्भात काही देणं घेणं नव्हते का? असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. इतके दिवस त्यांनी संवाद का साधला नाही. पक्षश्रेष्ठींना का संवाद साधला नाही. भाजपकडे सगळी सुत्रे सोपवली होती का? असा प्रश्न निर्माण होतो. पार्थ पवारांचे वक्तव्य हे निराधार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बारामतीसाठी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. काँग्रेसच्या सर्व नेत्यांशी चर्चा करत आम्ही पुढची भूमिका घेऊ. सुनेत्रा पवारांशिवाय आणखी कोणीही आमच्या नेत्यांशी किंवा काँग्रेसशी संपर्क केलेला नाही. पार्थ पवारांचे वक्तव्य हे निराधार आहे. त्यांच्या वाक्यासंदर्भात त्यांना कधीतरी पश्चताप होईल. अजित पवार यांचे पुत्र असल्याने त्यांनी भान राखले पाहिजे. सरकारचे वाभाडे निघण्याचा प्रकार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात आम्ही जी अट ठेवली आहे ती काय चुकीची नाही. अजित पवार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला तर काँग्रेसचे आकाश मोरे उमेदवारी अर्ज मागे घेणार ही त्यांची भूमिका आजपण कायम आहे. हे होत असताना गुन्हा दाखल करावा ही मागणी करावी लागते. पोलिस स्टेशनमध्ये जात बसावे लागते तिथे पोलिसांशी हुज्जत घालावी लागते. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाही म्हणून तो कर्नाटकात दाखल करावा लागतो. हे सर्व सरकारचे वाभाडे निघण्याचा प्रकार आहे. फडणवीस गुन्हा नोंदवू देत नाही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात गुन्हा नोंदवू देत नाही. त्यांच्या मृत्यूची चौकशी होऊ देत नाही. हे झरीतले शुक्राचार्य म्हणून देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत हे सर्वांना माहिती आहे. गु्न्हा दाखल करा अशी मागणी आम्हाला करायची गरजच पडायला नको होती. त्यापूर्वीच गुन्हा दाखल व्हायला हवा होता. हे सरकार मुकं, आंधळं, बहिरं सरकार आहे हे आम्ही विरोधक म्हणून सांगतच होतो. आता हे बेशर्म असल्याचेही दिसून येत आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!