ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

टँकरमुक्तीसाठी 836 गावांत 15 हजार 348 उपाययोजना:विहिर जलस्त्रोत असलेल्या गावातील योजनांचे होणार बळकटीकरण, उपाययोजना सुचवल्या‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचे प्रमाण घटणार असून, जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ज्या पाणी योजनांना विहिर जलस्त्रोत आहे, त्या विहिरी कोरड्या पडल्याने तेथील पाणी योजना बंद होऊन, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हे चित्र बदलवून, टँकरमुक्तीसाठी ८३६ गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाद्वारे १५ हजार ३४८ उपाय योजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला शासनाने मंजुरी दिल्यास भूजलपातळी वाढणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात टँकरची मागणी वाढते. त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात विहिरीवर अवलंबून असलेल्या स्वतंत्र पाणी योजना बंद पडतात. या योजना सुरळीत ठेवण्यासाठी तसेच खालावलेली भूजलपातळी सूस्थितीत आणण्यासाठी उपाय योजना सुचवण्यात आल्या आहेत. टँकरची १५ मेपर्यंत वाढल्याचे दिसून आले असून, सद्यस्थितीत ७३ टँकरद्वारे ९२ गावांना पाणीपुरवठा होत आहे. जून महिन्यात पावसाला सुरूवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने जुलैअखेर टँकरची संख्या कमी होताना दिसून येते. हे चित्र बदलवून टाकण्यासाठी एलनिनोच्या पार्श्वभूमीवर आराखडा महत्वपूर्ण ^ एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पावसात मोठा खंड पहायला मिळणार आहे. अशा स्थितीत पडणारे पावसाचे पाणी साठवून, भूजल पातळी वाढवणे आवश्यक आहे. जर हे शक्य झाले, तर भूजलाचा अतिउपसा असलेली सुमारे ८० टक्के गावे सेफ झोनमध्ये आणता येतील. या आराखड्याद्वारे १६७२जलस्त्रोतांचे बळकटीकरण शक्य आहे. तसेच ८३६ गावे टँकरमुक्त करणे शक्य होईल. -अजिंक्य काटकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर