सोलापुरातील प्रख्यात कवी, गीतकार आणि ज्येष्ठ साहित्यिक माधव रामचंद्र पवार (वय ७१) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या १२-१३ वर्षांपासून ते किडनीच्या व्याधीने त्रस्त होते. या काळात तब्बल १ हजार ६५० डायलिसिस सोसून त्यांनी मृत्यूशी कडवी झुंज दिली, मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. ते ज्येष्ठ कवी आणि गीतकार रा. ना. पवार यांचे चिरंजीव होत. वेदनांशी मेत्री करणारा कवी म्हणून त्यांची ओळख होती. माधव पवार यांच्या निधनामुळे सोलापूरच्या साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून एक हळवा आणि जनसामान्यांचा कवी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. माधव पवार यांनी सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३५ वर्षे वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा बजावली. नोकरी सांभाळून त्यांनी आपले साहित्यप्रेम जोपासले. त्यांचे ‘हे शुभशकुनांचे पक्षी’ आणि ‘गरूडभरारी’ हे काव्यसंग्रह रसिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना २१ राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. २००६ मध्ये सोलापूर येथे झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ‘स्वागत गीत’ लिहिण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. स्वरांचा साज आणि साधेपणाची ओढ माधव पवार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक सुरेश वाडकर, आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी स्वरसाज चढवला आहे. “सोपी कविता लिहिणे हेच सर्वात अवघड काम असते,” असे ते नेहमी म्हणायचे. आपल्या वडिलांकडून मिळालेला साध्या आणि सोप्या कवितेचा वारसा त्यांनी शेवटपर्यंत जपला. “कविता सामान्य जनतेला समजेल अशीच असावी,” हा त्यांचा आग्रह त्यांच्या प्रत्येक रचनेत दिसून यायचा. आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार माधव पवार यांच्या निधनाची वार्ता समजताच सोलापूरसह राज्यभरातील साहित्यिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज सायंकाळी ‘मोदी स्मशानभूमी’ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ कवी माधव पवार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन:वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वेदनांशी मैत्री करणारा कवी म्हणून ओळख
-
By सुरेश पाचभाई
- May 6, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
नाशिकमध्ये शेतकऱ्यांना मारहाण:जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 6, 2026
हिंगोली अवकाळी पावसामुळे हळद भिजली:क्रांतिकारी शेतकरी संघटनेने...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 6, 2026
ममता बॅनर्जींची राजीनामा न देण्याची भूमिका चुकीची:बंगालमध्ये...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 6, 2026
सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी पत्नीनेच दिली पतीची सुपारी:मुख्य...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 6, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर:राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 6, 2026
नसरापुरात चिमुकलीसोबत नेमके काय घडले?:पोलिसांनी कुणालाही कळू...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 6, 2026
