ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

ज्येष्ठ कवी माधव पवार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन:वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वेदनांशी मैत्री करणारा कवी म्हणून ओळख

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापुरातील प्रख्यात कवी, गीतकार आणि ज्येष्ठ साहित्यिक माधव रामचंद्र पवार (वय ७१) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या १२-१३ वर्षांपासून ते किडनीच्या व्याधीने त्रस्त होते. या काळात तब्बल १ हजार ६५० डायलिसिस सोसून त्यांनी मृत्यूशी कडवी झुंज दिली, मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. ते ज्येष्ठ कवी आणि गीतकार रा. ना. पवार यांचे चिरंजीव होत. वेदनांशी मेत्री करणारा कवी म्हणून त्यांची ओळख होती. माधव पवार यांच्या निधनामुळे सोलापूरच्या साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून एक हळवा आणि जनसामान्यांचा कवी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. माधव पवार यांनी सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३५ वर्षे वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा बजावली. नोकरी सांभाळून त्यांनी आपले साहित्यप्रेम जोपासले. त्यांचे ‘हे शुभशकुनांचे पक्षी’ आणि ‘गरूडभरारी’ हे काव्यसंग्रह रसिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना २१ राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. २००६ मध्ये सोलापूर येथे झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ‘स्वागत गीत’ लिहिण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. स्वरांचा साज आणि साधेपणाची ओढ माधव पवार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक सुरेश वाडकर, आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी स्वरसाज चढवला आहे. “सोपी कविता लिहिणे हेच सर्वात अवघड काम असते,” असे ते नेहमी म्हणायचे. आपल्या वडिलांकडून मिळालेला साध्या आणि सोप्या कवितेचा वारसा त्यांनी शेवटपर्यंत जपला. “कविता सामान्य जनतेला समजेल अशीच असावी,” हा त्यांचा आग्रह त्यांच्या प्रत्येक रचनेत दिसून यायचा. आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार माधव पवार यांच्या निधनाची वार्ता समजताच सोलापूरसह राज्यभरातील साहित्यिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज सायंकाळी ‘मोदी स्मशानभूमी’ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर