ब्रेकिंग न्यूज
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video
SP News Maregaon

नीट पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी:जळगाव जामोदमध्ये काँग्रेसची मागणी; तहसीलदारांना निवेदन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी आज, दि. १८ मे रोजी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यामध्ये नमूद केले की, देशात शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण होत असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी गंभीर प्रकारे खेळ केला जात आहे. नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणामुळे सुमारे २२ लाख ८० हजार विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. या प्रकरणातील आरोपी कुलकर्णी, वाघमारे व इतर संबंधित अधिकारी आणि दोषींना तत्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशा मागाण्या निवेदनाṇद्वारे करण्यात आल्या आहेत. तसेच सद्य:स्थितीत शेती मशागतीचे दिवस सुरू असून शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर हे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर १५ ते २० किलोमीटरपर्यंत पंपावर न्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, इंधनाचाही अपव्यय होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर