भारतीय जनता पक्षाचे गुंड आम्हाला रोज धमक्या देतात आम्ही तक्रारी करतो का? आम्ही लढतो आहोत. तुम्हाला एक धमकी आली तर तुम्हाला घाम फुटला असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीवर बोलताना म्हटले आहे. देशामध्ये आता झुरळ बंड करायला लागले तर विषय धमकीच्या पुढे काही होऊ शकते. संजय राऊत म्हणाले की, भाजपवाले किती षंढ आहेत हे गेल्या दोन दिवसांमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी दाखवले आहे, ऑपरेशन सिंदूरपासून. सत्ताधारी पक्षातील माणसाला धमकी येऊच शकत नाही. त्यांना किती सुरक्षा आहे ते पहावे. स्वत:च्या 25 गाड्या आणि सरकारच्या 4 गाड्या फिरतात. तुम्ही असे काय काम केले आहे महाराष्ट्रासाठी? देशासाठी? तुम्ही काय स्वत:ला भगतसिंग समजतात का? आमच्या पक्षाला षंढ म्हणणाऱ्या लोकांनी स्वत:च्या लेंग्याची नाडी सोडून बघावे तुम्ही कोण आहात, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न संजय राऊत म्हणाले की, भाजपच्या लोकांकडून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात पेट्रोल-डिझेलसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीवर काहीही बोलले जात नाही. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसहे कोणता पक्ष टिकू देणार नाही. झुरळे सरकारला सळो की पळो करतील संजय राऊत म्हणाले की, झुरळ जनता पार्टी ही सोशल मिडीयावर सरकारविरोधात लढत आहे. झुरळ पक्षाचा मी जाहीर नामा वाचला आहे, ते जे अभिजीत दिपके आहेत त्यांनी ते बोस्टन विद्यापीठात शिकत आहे. मी त्यांची भूमिका समजून घेतली. जेव्हा तरुण विद्रोहासाठी उभे राहतात, त्यावेळी तरुणांचे मन समजून घेतले पाहिजे. ज्यांची डिग्री धूळ खात पडली आहे, पेपर फुटीमुळे ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे त्यांच्यासाठी हा पक्ष आहे. निवडणूक आयोग, न्यायालय असे कोणाकडूनही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचा हा पक्ष आहे. त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे सरकार घाबरले आहे. आता दोन पायाची झुरळे सरकारला सळो की पळो करतील.
