ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

जागतिक पातळीवर पंतप्रधान ‘रिजेक्ट माल’!:कॉंग्रेस नेते नाना पटोलेंची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले- त्यांच्यामुळे देशाची मान शर्मेने खाली गेली

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी तरुण पिढीचा उल्लेख ‘कॉकरोच’ असा केल्याच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या ट्रेंडचा संदर्भ देत, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशाच्या तरुण पिढीला अशा प्रकारची उपमा दिली जाणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, तरुणांचा सातत्याने होणारा अपमान आणि वाढती बेरोजगारी यामुळेच आजच्या तरुण वर्गात केंद्र सरकारविरोधात तीव्र असंतोष खदखदत असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. नाना पटोले म्हणाले, देशातील सुशिक्षित तरुण-तरुणी आणि पदव्युत्तर पदव्या घेऊनही बेरोजगार बसले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कधी त्यांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला जातो, तर कधी इतर गोहस्ति सांगितल्या जातात. तरुणांचा हा पदोपदी होणारा अपमान आता त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. पंतप्रधानांमुळे जागतिक पातळीवर देशाची मन शर्मेने खाली गेली आहे. जागतिक पातळीवर पंतप्रधान रिजेक्ट माल आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. मोदींच्या परदेश दौरे आणि त्यात होणाऱ्या घडामोडींवरून नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात की, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमुळे देशाचा फायदा होतो, अनेक महत्त्वपूर्ण करार केले जातात. मात्र, आता फडणवीसांनीच यावर उत्तर दिले पाहिजे की, इटलीमध्ये जाऊन तिथल्या महिला राष्ट्राध्यक्षांना चॉकलेटची भेट देणे कितपत योग्य आहे? पंतप्रधानांचे हे वर्तन हास्यास्पद असल्याची टीका पटोले यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्यावर रिजेक्ट माल म्हणून देवेंद्र फडणवीसांनी टीका केली होती. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, जे राहुल गांधींना रिजेक्ट माल म्हणत होते, त्यांनी आता पहावे की, त्यांचे स्वतःचे पंतप्रधान आज जागतिक पातळीवर रिजेक्ट माल ठरत आहेत. पंतप्रधानांच्या अशा कृतींमुळे देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमुळे देशावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार पडत असून, या दौऱ्यांमधून देशाच्या पदरात काय पडले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर