ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

रामाचे आचरण अन् हरिस्मरण यातच सुखी जीवनाचे गमक:रायतळे येथील संगीत कथा सोहळ्यात गायक राजेंद्र टाक यांचे निरुपण‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“प्रभू श्री रामाचे आदर्श आचरण, भगवान श्रीकृष्णाची अचूक नीती आणि अखंड हरिस्मरण-नामसंकीर्तन यातच मानवाच्या आनंदी आणि समाधानी जीवनाचे खरे गमक दडलेले आहे,” असे निरुपण गायक तथा वक्ते राजेंद्र टाक यांनी केले. पारनेर तालुक्यातील आनंदाश्रम (रायतळे) येथे आयोजित त्रिदिन ‘राम कृष्ण हरी’ विशेष संगीत कथा सोहळ्यात ते बोलत होते. अधिकमासाचे पवित्र औचित्य साधून १७ मे ते १९ मे २०२६ या कालावधीत या अध्यात्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कथेच्या पहिल्या दिवशी श्रीरामाच्या जीवनावर प्रकाश टाकताना टाक म्हणाले, “श्रीरामकथेतून आपल्याला जीवन जगण्याचे अनेक मौल्यवान बोध मिळतात, जे आजच्या आधुनिक युगातही तितकेच महत्त्वाचे आहेत. रामायण हे केवळ एक महाकाव्य नसून, माणसाला आदर्श व सुसंस्कारीत जीवन जगण्याची दिशा दाखवणारा राजमार्ग आहे. दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे मर्म समजावून सांगताना ते म्हणाले की, बुद्धीमान, धर्माधारित आणि परिस्थितीनुरूप योग्य कृती करण्याची थोर शिकवण भगवान श्रीकृष्णाने दिली आहे. श्रीकृष्णाने मानवाला नेहमीच धर्म, कर्तव्य, प्रेम, सत्य आणि व्यावहारिक ज्ञान यांचा अचूक समतोल राखण्याचा अमर संदेश दिला. कथेची सांगता करताना टाक यांनी वारकरी संप्रदायाचा खरा अर्थ स्पष्ट केला. “जो माणूस आपल्या माता-पित्यांच्या ऋणाची जाणीव ठेवतो, जीवनात सेवा आणि दयाभावाचा अंगीकार करून अहंकाराचा पूर्णपणे त्याग करतो, तोच खरा वारकरी ठरतो; आणि अशाच निष्कलंक भक्ताला हरी पावतो,” असे त्यांनी सांगितले. या कथा श्रवण सोहळ्यासाठी रायतळे आणि परिसरातील पंचक्रोशीतून अनेक साधुसंत तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती. आश्रमाच्या वतीने ह.भ.प. राघवानंद महाराज यांनी देवस्थानच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती दिली. या सोहळ्याला सुपा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (पीआय) गडकरी मॅडम, भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक झरेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्यात दररोज हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आश्रमाच्या सर्व साधकांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. कथा सांगतेच्या प्रसंगी उद्योजक बापूसाहेब डोके यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर