ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

बच्चू कडूंवर उद्धव ठाकरेंचा पहिलाच घणाघात:मंत्री करणं ही माझीच चूक ठरली; प्रहारच्या कार्यकर्त्यांसमोर ठाकरे भडकले, थेट निशाणा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर पहिल्यांदाच उघडपणे निशाणा साधला. घरी बोलावून त्याला मंत्री केलं, ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत, त्यांना जाऊ द्या, अशा शब्दांत ठाकरे यांनी बच्चू कडूंवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रहार संघटनेतील सोलापूर, परभणी आणि धाराशिवमधील अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हा राजकीय हल्ला पाहायला मिळाला. या कार्यक्रमामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकीही मिळाली. मात्र या निर्णयामुळे प्रहार संघटनेत नाराजी निर्माण झाली होती. मराठवाड्यातील अनेक कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंवर उघडपणे टीका करत आपण फसवलो गेल्याची भावना व्यक्त केली. अखेर हे नाराज कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत दाखल झाले. यावेळी पक्षनेते अंबादास दानवे तसेच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते. पक्षप्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केले. आम्हाला विकून बच्चू कडूंनी मिंधेसेनेत प्रवेश केला. आम्ही स्वाभिमानी आहोत, त्यामुळे ठाकरे साहेबांसोबत आलो, असे कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यानंतर उद्धव ठाकरे यांनीही बच्चू कडूंवर टीकेची तोफ डागली. आपल्यातून गेलेला माणूस जुना शिवसैनिक होता. त्याला मोठं करण्याची जबाबदारी आम्ही घेतली. पण काही लोक सत्तेच्या आणि पदाच्या मोहात अडकले, असे म्हणत ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटावरही निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू हे प्रहार पक्षाचे एकमेव आमदार होते. त्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बच्चू कडूंना मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बच्चू कडू गुवाहाटीला गेले आणि पुढे त्यांनी शिंदे गटासोबत राजकीय वाटचाल सुरू ठेवली. अलीकडेच त्यांनी प्रहार पक्षाचे शिवसेनेत विलिनीकरण करत विधान परिषदेवर आमदारकी मिळवली. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. बच्चू कडू आणि ठाकरे गटातील संघर्ष तीव्र दरम्यान, बच्चू कडूंनी यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट करत आपण कोणत्याही पदासाठी शिवसेनेत गेलेलो नसल्याचे म्हटले होते. मला काही मागायचं असतं तर गुवाहाटीलाच मागितलं असतं. मी मंत्रिपदासाठी नाही, तर दिव्यांग मंत्रालयासाठी लढलो, असे ते म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या भूमिकेनंतरही प्रहार संघटनेतील मोठा गट नाराज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर