धारदार शस्त्राने वार करुन एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना जालना शहरातील राजमहल टॉकीज परिसरात 13 जून रोजी घडली होती. या घटनेच्या दिवशी सदर बाजार पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याची सखोल चौकशी केली असता जुना वाद व अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून केल्याची कबूली आरोपीकडून मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी खून करण्यासाठी आरोपीने वापरलेले धारदार शस्त्र जप्त केले आहे. रफीक कासीम शेख (टटूपुरा,जालना) असे मृताचे नाव आहे. तर काशाफ खान फेरोज खान (18, नादी कॉलनी, बावन एकर जालना)असे खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. मयत इसमरफीक कासीम शेख हा वाळूचा व्यवसाय करीत होता. त्याची हत्या झाल्यावर सदर बाजार पोलिसांनी पथके करुन तपास करुन आरोपी उघड केला. हा गुन्हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजारचे पीआय संदीप भारती, उपनिरीक्षक सचिन सानप, जगन्नाथ जाधव, रामप्रसाद रंगे, धनंजय कावळे आदींनी हा खुनाचा गुन्हा उघडकेला आहे. दरम्यान, हत्यारे कोठून आणले, अजून कुणी यात आहे का, याचा तपास पोलिसांकडून केल्या जात आहे. सीसीटीव्हीने तपासाला मिळाली खरी गती हत्या करण्यासाठी आरोपी हास्कुटीवरुन तोंडाला रुमाल बांधून आला होता. तो येत असतांना शहरतील सीसीटीव्हीत कैद झाला होता. पोलिसांनी या सीसीटीव्हीआधारे पहिल्या दिवशी त्याला ताब्यात घेतले होते. त्या आधारे त्याच चौकशी केली. सुरुवातील त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. नंतर त्याने गुन्हा कबुल केला असून आरोपीकडून स्कुटी, धारदार शस्त्र असा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातील जागोजागी असलेल्या सिसीटीव्हींमुळे पोलिसांना तपासाला चांगलीच मदत होऊ लागली आहे. नाशिकमध्ये 4 लग्न केलेल्या प्रियकरानेच केला लिव्ह इन पार्टनरचा खून दुसरीकडे नाशिकमध्ये कन्नमवार पुलाच्या खाली सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. मृत महिलेचे नाव सुनीता विश्वकर्मा (30) असून तिच्या प्रियकरानेच तिचा नाक व तोंड दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. गोपी गोसावी असे या संशयिताचे नाव आहे. आडगाव पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ निरीक्षक संजय पीसे यांनी याबाबत माहिती दिली. महिलेचे लग्न झालेले आहे. ती संशयित गोपी गोसावी याच्या सोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. त्याचे 4 लग्न झाले आहे. घटनेच्या दिवशी त्यांचे काही तरी कारणाने वाद झाले. सुनीताचे नाक-तोंड दाबून तिला जीवे ठार मारले. घरातील सुटकेसमध्ये तिचा मृतदेह कोंबून भरला. मित्राच्या दुचाकीवर सुटकेस ठेवून कन्नमवार पुलाच्या खाली सुटकेस फेकून दिली.
भावाने दारुच्या नशेत असेल असे समजून केले दुर्लक्ष खून केल्यानंतर गोपीने भावाला फोन करुन घडलेला प्रकार सांगीतला होता मात्र, भावाने दारुच्या नशेत बोलत असावा म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तीन दिवसांनतर प्रसारमाध्यम, वृत्तपत्रात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. बातमी बघताच भावाच्या पायाखालची वाळू सरकली आणि थेट पोलिसांत धाव घेतली. पथकाने संशयिताला ताब्यात घेतले आहे.
जालना हादरले!:अनैतिक संबंधाच्या संशयातून राजमहल टॉकीज परिसरात तरुणाचा खून, 18 वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात
auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे
धारदार शस्त्राने वार करुन एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना जालना शहरातील राजमहल टॉकीज परिसरात 13 जून रोजी घडली होती. या घटनेच्या दिवशी सदर बाजार पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले...