ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

शिंदे गटाला पश्चाताप झाला असेल तर ‘मातोश्री’वर यावे:सरकारकडून अनेक योजनांमध्ये जनतेची फसवणूक- संजय राऊत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उबाठाचा पहिल्या क्रमाकांचा शत्रू हा शिंदे गट आहे. याचा अर्थ असा नाही की भाजप काही दानशूर पक्ष आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दोन्ही शिवसेना एकत्र यावे असे मत व्यक्त करत असाल तर आम्ही मातोश्रीवर बसलो आहोत. तुम्हाला पश्चताप झाला असेल तर तो व्यक्त करण्याची जागा ही मातोश्री हे निवासस्थान आहे. ज्या पद्धतीने ते बाहेर पडले त्यासाठी पश्चताप तर करावा लागेल ना? ते मातोश्रीवर आले तर विचार करू, असे अब्दुल सत्तार आणि संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊतांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा हा एक फसवणुकीचा प्रकार असतो. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी ही मागणी आहे. लाडकी बहीण, शेतकरी कर्ज माफीसह अनेक योजनांमध्ये फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होत नसतील तर त्यांनी भाजपला मतदान करू नये. मोदी, फडणवीस यांच्या सभेला शेतकऱ्यांनी जावू नये मग सर्व प्रश्न सुचतील. शिंदे सेना ठेकेदारीच्या पैशांवर उभी संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरला हे चांगलेच आहे. यामुळे नगरसेवकांना आर्थिंक बळ मिळेल. नाशिकमध्ये उमेदवार द्यायचा नाही हा निर्णय उद्धव ठाकरेंशी चर्चा करत झाला. सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण अनेक ठिकाणी निकाल स्पष्ट दिसत आहे. शिंदे सेना हा काही मोठा फोर्स नाही हे सर्व ठेकेदारीच्या पैशातून आलेले आहे. ..म्हणून आम्ही उमेदवार दिला नाही संजय राऊत म्हणाले की, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक आहे. यातील काही जागा सोडल्या तर मविआकडे संख्याबळ जरी नसले तरी जागा बिनविरोध होऊ नये यासाठी मविआने उमेदवार देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार कोकण, पुणे, सातारा,विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी उमेदवार उभे करत आपले अस्तित्व दाखवण्याचा मविआने प्रयत्न केला आहे. नाशिकमध्ये संख्याबळामध्ये मोठा फरक आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी कोणी जास्त इच्छूक नाही. 100 पेक्षा जास्त संख्याबळ असते तर आम्ही उमेदवार देण्याचे धाडस केले असते. ग्रामपंचायतीसाठी विमाने घेऊन फिरणारे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री संजय राऊत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विमाने घेऊन फिरतात. तिथे रणधुमाळी असते विधान परिषदेच्या निवडणुकीत रणधुमाळी नसते. ज्यांच्याकडे संख्याबळ आहे, त्यांचे रणधुमाळी जास्त. नाशिकमध्ये काय होते हे पहावे लागेल. विधान परिषद निवडणुकीमध्ये मी सक्रिय नव्हतो. नाशिकमध्ये आमचा उमेदवार अर्ज दाखल करणार होते पण संपर्कप्रमुखांनी घोडे बाजार होऊ नये म्हणून उमेदवार दिले नाही. भाजप आणि शिंदे असले तिथे घोडेबाजार होतोच. आमच्या नगरसेवकांना काय उद्धव ठाकरे काय भूमिका घ्यायला लावतात हे तुम्हाला लवकरच कळेल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर