ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

हातभट्टीची दारू अधिकृत करा:शासनालाही महसूल मिळेल; रामदास आठवलेंची मागणी; मराठा आरक्षण आणि ओबीसी उपवर्गीकरणावरही भाष्य

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आपल्या हटके वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी भिवंडी दौऱ्यात एक अजब मागणी केली आहे. राज्यातील विषारी दारूमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकारने ‘हातभट्टीची दारू अधिकृत करावी’, असे अजब विधान आठवलेंनी केले आहे. हे आपले वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी यातून शासनाला महसूल मिळेल आणि गोरगरिबांचे जीव वाचतील, असा दावा केला. पुणे येथे विषारी दारूमुळे २२ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत आठवले म्हणाले की, “हातावर पोट असणारा मजूर आणि कामगार वर्ग प्रामुख्याने स्वस्त असणारी हातभट्टीची दारू पितो. माझे वैयक्तिक मत असे आहे की, सरकारने हातभट्टीची दारू अधिकृत करावी. यामुळे ही दारू सर्वसामान्य मजूर वर्गाला परवडणाऱ्या दरात मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यावर शासनाचे कायदेशीर नियंत्रण राहील, ज्यामुळे विषबाधेसारख्या घटना टळतील. यातून शासनाला मोठा महसूलही मिळेल आणि गोरगरीब मजुरांचे जीवही वाचतील.” मराठा-ओबीसी आरक्षणावर मांडली भूमिका मराठा आरक्षणावर बोलताना आठवले यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा आदर करत आरपीआयचा पाठिंबा जाहीर केला. मात्र, त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना दाखले द्यावेत; मात्र सरसकट मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करणे योग्य ठरणार नाही. मूळ ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचा १० टक्के ‘ईडब्ल्यूएस’ गटामध्ये समावेश करून आरक्षण देता येईल. आगामी जनगणनेनंतर सर्व समाजाची खरी आकडेवारी समोर येईल. ज्याची जेवढी लोकसंख्या, त्या प्रमाणात त्याला आरक्षण मिळावे, असेही त्यांनी नमूद केले. जातीव्यवस्था मनातून संपेल तेव्हाच आरक्षण सोडू अनुसूचित जाती-जमातींच्या उपवर्गीकरणावर भाष्य करताना आठवले म्हणाले की, “आजही खेड्यापाड्यात दलितांवर अन्याय होत आहेत. देशात जातीव्यवस्था कायद्याने संपली असली तरी लोकांच्या मनातून ती अद्याप गेलेली नाही. ज्या दिवशी मनातून जातीभेद पूर्णपणे नष्ट होईल, त्या दिवशी आम्ही स्वतःहून आरक्षण सोडण्यास तयार आहोत.” पक्षाच्या विस्तारासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना सल्ला देताना त्यांनी आरपीआयला केवळ एका समाजापुरते मर्यादित न ठेवण्याचे आवाहन केले. “केवळ एका समाजाच्या मतांवर सत्ता मिळवता येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार देशभर पोहोचवायचा असेल, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांना पक्षात स्थान देऊन त्यांना न्याय दिला पाहिजे,” असेही आठवले यावेळी म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर