तिवसा शहरात चर्चांना उधाण; पानटपऱ्या झाल्या अचानक बंद:तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीमुळे भिती‎

शहरातील प्रमुख व्यापारी व रहदारीचा केंद्रबिंदू असलेल्या पेट्रोलपंप चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक पानटपऱ्या अचानक बंद दिसून येत असल्याने सध्या शहरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, नेहमी दिवसभर गजबजलेल्या या चौकातील काही पानटपऱ्या आज सकाळपासूनच पूर्णपणे बंद आढळल्याने, संबंधित व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व इतर आरोग्यास घातक असणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीवर प्रशासनाने आता आपले लक्ष केंद्रित केले आहे. संभाव्य कडक कारवाई, मोठी दंडात्मक कारवाई, तसेच दुकानांचे परवाने आणि नियमांची होणारी कडक तपासणी या पार्श्वभूमीवर अनेक पानटपरी चालक कमालीचे सावध झाले आहेत. प्रशासकीय कारवाईचा थेट फटका बसू नये, म्हणूनच अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय तात्पुरते बंद ठेवणे पसंत केल्याचे बोलले जात आहे.पेट्रोलपंप चौक हा शहरातील मुख्य मार्ग आणि गर्दीचे ठिकाण असल्याने या भागात पानटपऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, अचानक एकाच वेळी अनेक दुकाने बंद झाल्यामुळे हा परिसर रिकामा रिकामा वाटत असून, हे चित्र येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेत प्रकर्षाने भरत आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात अद्याप प्रशासनाकडून कोणतीही मोठी किंवा थेट कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु, केवळ प्रशासनाच्या आगामी हालचालींची आणि छाप्यांची कुणकुण लागताच पानटपरी व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.आता या सर्व परिस्थितीवर “खाकीचा धाक की प्रशासनाची आगामी मोठी कारवाई असा प्रश्न उपस्थित केला.

Leave a Comment

error: Content is protected !!