ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

संख्याबळ नसताना काँग्रेस पराभवासाठी का लढतेय?:राहुल गांधी सोन्याचा चमचा घेऊन मोठे झाले, त्यांना आर्थिक टंचाई काय कळणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राहुल गांधी हे सोन्याचा चमच्याने बदमाचा ज्यूस पीत मोठे झाले आहेत. त्यांना आर्थिक टंचाई काय हे माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा विचार केला आहे. देशाची स्थिती भक्कम राहील यासाठी त्यांना मेहनत घेतली आहे, त्यामुळे राहुल गांधींनी यावर बोलणं हास्यास्पद आहे, असे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अब्दुल सत्तार हे काही नाराज नाही, त्यांची आणि माझी कालच भेट झाली. काही ठिकाणी छोटे-छोटे विषय असतात मतभेद असतात त्यातून काही वक्तव्य केली जातात. पण अब्दुल सत्तार हे सिस्टीमचे लीडर आहेत. त्यांचा मुलचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल. विदर्भातील 5 ही जागा महायुती जिंकेल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस उमेदवार सुद्धा विचार करत आहेत की ही निवडणूक लढवून त्यांना काय फायदा आहे. संख्याबळ नसताना केवळ पराभवाकरता का म्हणून लढतील? संख्याबळाचा इतका मोठा फरक असताना न लढलेले बरे आहे. पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असल्याने निवडणूक काँग्रेसने निवडणूक लढवू नये. विदर्भातील 5 ही जागा महायुती जिंकेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. संख्याबळ नसल्याने काँग्रेसने माघार घ्यावी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ज्यास अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत ते सर्वच उमेदवार अर्ज माघारी घेणारी आहेत. महायुतीचे नेत्यांनी सर्वच अपक्ष उमेदवारांशी चर्चा केली आहे. काँग्रेसला सुद्धा आम्ही विनंती केली आहे की ज्या ठिकाणी संख्याबळ खूपच कमी असेल त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक होऊ द्यावी. ही निवडणूक संख्याबळावर होत असते त्यामुळे भाजप आणि महायुती निवडूण येतांना दिसत आहे. त्यामध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा आहे त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी केला पाहिजे. अपक्ष उमेदवारांवर काय कारवाई करायची बघू चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जे उमेदवार ऐकणार नाही त्यांचे काय करायचे ते बघू. पण जिथे अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहे तिथे उमेदवार मागे घेतील. अपक्ष उमेदवारी मागे घेतली नाही तर काय कारवाई करायची हे त्या त्या पक्षाचे नेते ठरवतील. फार काही बंडखोरी होईल असे वाटत नाही, काहीच जण अपक्ष लढतील. पुणे-नाशिकमध्ये सुद्धा जे अपक्ष उमेदवार आहेत ते सुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज आज दुपारी 3 वाजेपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर