ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

जळगाव विधान परिषदेत महायुतीची डोकेदुखी वाढली!:नाशिकमध्ये माघार, पण रेश्मा काळे बंडावर ठाम; भाजप नगरसेवकही संपर्कात असल्याचा दावा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) समर्थित अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अखेर माघार घेत महायुतीचे उमेदवार संजय पवार यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे नाशिकमधील बंडखोरीचा अध्याय संपुष्टात आला असला, तरी जळगावमध्ये मात्र महायुतीसमोरील संकट कायम आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी निवडणूक मैदानात कायम राहण्याचा निर्धार व्यक्त केला असून, त्या कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार असताना रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या मतविभाजनाची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. “नाशिकचा निर्णय जळगावला लागू होत नाही” नाशिकमध्ये गोकुळ गिते यांनी माघार घेतल्याने जळगावमध्येही तशाच प्रकारची घडामोड होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र रेश्मा काळे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “अनेक दिवसांपासून माझ्या माघारीबाबत चर्चा सुरू आहेत. नाशिकमधील प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, त्यानंतर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र सध्या मी निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी आणखी वाढल्याचे मानले जात आहे. प्रचाराला वेग; महिला आघाडी मैदानात रेश्मा काळे यांच्या समर्थनार्थ शिवसेना शिंदे गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. महिला जिल्हा आघाडीच्या सरिता माळी-कोल्हे यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली असून विविध भागांत मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, सदस्य आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क वाढवण्यावर काळे समर्थकांचा भर असल्याचे दिसत आहे. “भाजपचे नगरसेवकही आमच्या संपर्कात” दरम्यान, प्रचारादरम्यान सरिता माळी-कोल्हे यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “अंदर की बात है, भाजप के नगरसेवक हमारे साथ है,” असा दावा त्यांनी केला. भाजपमधील काही नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी रेश्मा काळे यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सूचित केले. या दाव्यामुळे जळगावमधील महायुतीच्या अंतर्गत नाराजीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या दाव्याबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा रेश्मा काळे यांचे समर्थक सध्या मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे निवडणुकीत शेवटपर्यंत लढण्याचा निर्णय कायम ठेवण्यात येणार असल्याचे त्यांच्या गोटातून सांगितले जात आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात शिंदे गटाशी संबंधित बंडखोर उमेदवार मैदानात असल्याने ही लढत अधिक चुरशीची बनली आहे.

जळगावची लढत प्रतिष्ठेची का? जळगाव हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी या जागेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येथे झालेली कोणतीही मतांची फूट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे, एकनाथ खडसे आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला केवळ निवडणूक प्रतिक्रिया न मानता व्यापक राजकीय संदेश म्हणूनही पाहिले जात आहे. महायुतीसमोर मोठे आव्हान नाशिकमध्ये बंड शमवण्यात महायुतीला यश आले असले, तरी जळगावमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. रेश्मा काळे यांनी माघार घेण्यास नकार दिल्यास महायुतीच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेतात, रेश्मा काळे यांच्याशी चर्चा होते का आणि महायुती हे बंड थांबवण्यात यशस्वी होते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर