ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

‘सीताराम कारखान्या’च्या गेटवर ठिय्या:प्रदूषणामुळे खर्डीकर हैराण, धुराड्यातून पडणारी राख अन् दूषित पाण्यामुळे पिके धोक्यात‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम शुगर्स या खासगी साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी सोमवार पासून कारखान्याच्या प्रवेश द्वारावर ठिय्या आंदोलन सुरु केलेले आहे. दरम्यान, कारखाना प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवारपासून १० जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. खर्डी (ता. पंढरपूर) येथील सिताराम शुगर्स या कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणारी राख व बग्यास या उपद्रवामुळे परिसरातील अनेक स्थानिक शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कारखान्याने राखेच्या संदर्भात प्रदूषण मुक्तीची आणलेली मशीन बंद ठेवली असल्याने जवळपास ५ किलोमीटर परिसरात असणारी पिके तसेच घरांमधून राख पसरलेली दिसून येत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या स्थानिक अबालवृद्ध नागरिकांना श्वसनाचे विकार जडले असल्याचे दिसून येत आहे. दूषित पाणी, दूषित हवा, राख आणि बगॅसची धूळ यामुळे या परिसरातील पिके संकटात आलेली आहे, अनेक शेतकऱ्यांनी जनावरे सुद्धा यामुळे दगावली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कारखान्याने दूषित पाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारल्याने अनेक विहिरींना व आजूबाजूच्या विंधन विहिरीला दूषित पाणीपुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जाऊ लागले असल्याची तक्रार आजूबाजूचे ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत कारखाना प्रशासनाशी अनेक वेळा वारंवार पत्र व्यवहार करून देखील तसेच लेखी निवेदन देऊन देखील कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारपासून कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी अनिल आगावणे, गजान न घाडगे, विष्णू सुळे, काशिलिंग सुळे, राजू पुंडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कारखान्याचे प्रदूषण चाचणी नियामक मंडळाने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली. ^त्यांच्या मागण्या आहेत, त्यावर आम्ही त्यांना उत्तर दिलेले आहे. पोलीस डिपार्टमेंट येऊन गेले, त्यांनी कारखाना, प्रशासन आणि आंदोलकांना सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता कारखाना प्रशासन घेत आहे. इथून पुढेही आम्ही सुधारणा करू, त्यांच्या ज्या पण मागण्या आहेत, त्या कारखाना पहिल्यापासून सोडवत आलेला आहे आणि इथून पुढेही सोडवू. – सुयोग गायकवाड, कार्यकारी संचालक, सीताराम शुगर्स त्रास होणार नाही याची दक्षता कारखाना घेणार

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर