रोहित पवार हे पांडुरंगाला स्मरत आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर टीका करणारे वडापाव खात आंदोलन करत असतील तो त्यांचा अनुभव असेल, तो त्यांनी सांगितला असेल असे म्हणत असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांच्या आंदोलनासंदर्भात मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. काल शरद पवारांशी चर्चा झाली ते वरीष्ठ पातळीवर चर्चा करणार आहे. जर काही झाले नाही तर आमचा पक्ष रस्त्यावर उतरणार असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी असलेल्या सर्व अटी काढून सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी करावी. यासाठी नियम बनवावे आणि तशी योजना जाहीर करावी, अशी आमची मागणी आहे. सरकार आता आचारसंहितेचे नाव पुढे करत आहे. पण ज्यावेळी कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा विषय घेतला त्यावेळी आचरसंहिता कुठे होती? असा सवाल शशिकांत शिंदे यांनी केला आहे. आचारसंहितेचा जीआर काढायचा तो तुम्ही निवडणुकीनंतर काढू शकतात. पण एखाद्या पक्षाचा लोकप्रतिनिधी आंदोलनाला बसला म्हणून निर्णय लांबवत नेऊ नये ही आमची सरकारला विनंती आहे.
रोहित पवारांना अनेकांचा पाठिंबा शशिकांत शिंदे म्हणाले की, रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक नेते मंडळी रोज येत आहेत. काँग्रेसचे सुनील केदार सुद्धा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. सराकरने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यांचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील. निवडणूक होत असते पण महाराष्ट्राला प्रामाणिकपणे उभे करणारा शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. कर्जमाफीचे नियम शिथील करा शशिकांत शिंदे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीची योजना सरकारनेच जाहीर केली आहे. त्या निकषात जे शेतकरी बसत नाही इतकेच आमचे म्हणणे आहे. तुमचे नियम आणि अटी थोडे शिथील करायचे आहे. यामुळे किती बँका आणि संस्था बुडणार आहेत? ही दिल्यावर पुन्हा कर्जमाफी देणार नाही,असे सांगितले तर तुम्हाला दबाव येणार नाही.
