Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

हिंगोलीत किरकोळ कारणावरून एकास खंजीरने भोसकले:तिघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील रेल्वेस्टेशन पार्किंग जवळ किरकोळ कारणावरून एकास खंजीरने भोसकल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. ३१ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रिसालाबाजार येथील आदित्य सुर्यवंशी याचे त्या भागातील रहिवासी असलेल्या प्रथम कुऱ्हे याच्यासोबत वाद झाला होता. या वादातून त्यांच्यात मागील काही दिवसांत कुरुबुरी सुरु होत्या. त्यातून हाणामारी देखील झाली होती. मात्र प्रकरण मिटविण्यात आले होते. दरम्यान, आदित्य हा शनिवारी ता. ३१ दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रेल्वे पार्किंग येथे कामाला आला होता. त्या ठिकाणी तो काम करीत असतांना प्रथम कुऱ्हे हा त्याचा मित्र अरबाज व विकास खंदारे यांना सोबत घेऊन तेथे आले. त्याने किरकोळ कारणावरून सुरु असलेला वाद उकरून काढला. यावेळी त्यांच्या शाब्दीक चकमकीनंतर हाणामारी झाली. यामध्ये प्रथम याने आदित्य यास जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटात, गळ्यावर खंजीरने वार केले. अचानक खंजीरने होणारे वार अडविण्याच्या प्रयत्नात आदित्य याच्या हातालाही गंभीर दुखापत झाली. तर अरबाज याने दगडफेकून मारला तर विकास याने टोकदार हत्याराने आदित्य याच्या डोक्यात व उजव्या हातावर वार केले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आदित्य यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येेथे हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगमनाथ परगेवार, उपनिरीक्षक वाघमारे, राहुल महिपाळे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, शंकर ठोंबरे, शेख मुजीब, गणेश लेकुळे, संतोष करे, राहुल जोगे, अझहर पठाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!