पवार म्हणाले, चर्चा नको, मागणी मान्य करा‎:कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे फोनवर दोनदा चर्चेचे आवाहन, आ. रोहित पवारांचा नकार‎

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आ. रोहित पवार यांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज (शनिवार) दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. विविध संघटना, राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांची गर्दी आंदोलनस्थळी पाहायला मिळाली. आ. रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्या दिवशी किसान सभेचे अजित नवले, खा. निलेश लंके, खा. भास्कर भगरे, आ. राजू खरे, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आले होते. आंदोलन थांबवण्यासाठी कृषीमंत्री भरणे यांनी दोनवेळा फोन करून आंदोलन स्थगित करा, मुंबईला चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. मात्र आ. पवार यांनी चर्चा करण्याची आवश्यकता नाही, शासनाने मागण्या मान्य केल्याचे जाहीर करावे, आंदोलन मागे घेऊ, असे सांगितले. उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा.प्रणिती शिंदे आंदोलनास भेट देऊन पाठिंबा देणार आहेत. रविवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शटगार येणार. आज अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील येणार आहेत. रविवारी दुपारी एक वाजता येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीने आज गर्दी वाढण्याची शक्यता आहे. आंदोलनस्थळी दिवसातून ३ वेळा भजन, हरिपाठ आयोजित करण्यात येत आहे.शिवराज वाकोडे यांची तब्येत खालावली. उपचारासाठी न्यावे लागले. आ. रोहित पवार हे केवळ माध्यम आहेत, राज्य शासनाने लक्षात घ्यावे, राज्यातील सर्व शेतकऱ्यांची ही भावना आहे. सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा दोन दिवसानंतर शेतकरी मंत्र्यांना राज्यभरात फिरू देणार नाहीत, सर्वत्र आंदोलन सुरू होईल. खा. निलेश लंके यांचा इशारा आंदोलनस्थळी भजनाचा सूर

Leave a Comment

error: Content is protected !!