मोहोळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बायपासची गरज:234 किमी लांबीच्या महामार्गाला सर्व्हिस रोड जोडल्याने अपघातांत वाढ‎

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूरसह मोहोळ ते वाखरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो सुमारे २३४ किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. पुणे, सातारासह सोलापूर जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग आहे. या मार्गास ७,६२५ कोटी रुपयांच्या तरतुदीसह विकसित करण्यात येणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मात्र मोहोळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बायपास केल्यास वाहतूक कोंडीसह विकासाला चालना देणारा निर्णय होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूरसह मोहोळ ते वाखरी या मार्गाचे बांधकाम मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते धर्मपूरी, धर्मपूरी ते लोणंद, लोणंद ते दिवे घाट, दिवे घाट ते हडपसर जोडला जाणार असल्याची माहिती रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. सध्या मोहोळ पंढरपूर पालखी महामार्ग हा सर्व्हिस रोडलाच जोडल्यामुळे मोहोळ शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यासह नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना दररोज करावा लागत आहे. त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला आहे, तर काहींना कायमस्वरूपी अभंगतत्त्वासह किरकोळ दुखापतींचा सामना करावा लागत आहे. त्यातच नव्याने होणाऱ्या मार्गामुळे अधिकच मोहोळ शहरात वाहतूक कोंडीसह अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे सदर जोडल्या जाणाऱ्या मार्गाबरोबरच मोहोळ शहराला बायपास अत्यंत आवश्यक असून केल्यास उद्योग धंद्याबरोबरच वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाण कमीसह प्रवास सुखकर होण्यास मदत होईल. ^सध्या तापमान मध्ये बहुतांश वाढ होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूरसह मोहोळ ते वाखरी या मार्गाचे बांधकाम होणार आहे. सदर मार्ग होत असताना झाडे लावून जतन करण्यात यावीत. मोहोळ-पंढरपूर पालखी महामार्गासह राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. मात्र सदर रस्त्याच्या बाजूस वृक्ष लागवड केली आहे, परंतु जोपासण्यास प्रशासनास अपयश आले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूस असणारी झाडे हे पूर्वी लागवड केलेली आहे. संग्राम भोसले, नागरिक ^मोहोळ पंढरपूर या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पदयात्रा मार्ग उभारण्यात आला आहे. यामुळे वारकऱ्यांची वारी आता अधिक सुरक्षिततेसह सुव्यवस्थित झाली आहे. मात्र सदर पालखी महामार्ग हा सर्व्हिस रोडलाच जोडल्यामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यावली, हॉटेल रॉयल किंग मोहोळ, नजीक पिंपरी मार्गे बायपास केल्यास वाहतूक कोंडीसह अपघाताच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल. किसन लेंगरे, नागरिक ^मोहोळ शहरातील सर्व्हिस रोडवर बहुतांश वेळा वाहतूक कोंडी होत आहे. ब्रिजवर जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र करण्यात आले नाही. सदर ठिकाणावरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बायपास केल्यास वाहतूक कोंडी रोखण्यास मदत होईल. बाळासाहेब भरणे, पोलिस निरीक्षक, जिल्हा ट्राफिक पिंपरी मार्गे बायपास केल्यास अपघातांचे प्रमाण घटेल वाहतूक कोंडी रोखण्यास मदत

Leave a Comment

error: Content is protected !!