विधान परिषद निवडणुकीत भाजपचेउमेदवार नंदकिशोर महाजन यांनाउमेदवारी नेमकी कोणी मिळवून दिलीयाबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलटचर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखलकरण्याच्या दिवशी अंतर्गत नाराजीटाळण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनीदिल्लीवरून उमेदवारी जाहीर झाल्याचेस्पष्ट केले होते; मात्र रविवारीमहायुतीच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्रीतथा खासदार रक्षा खडसे यांनीउमेदवार दिल्लीचा नव्हे तर मंत्री गिरीशमहाजनांनी दिल्याचा दावा केल्यानेखळबळ उडाली; मात्र महाजनांनीखडसेंचा हा दावा खोडून काढत हानिर्णय वैयक्तिक नसून, केवळ दिल्लीव पक्षाचा असल्याचे स्पष्ट केले. विधान परिषदेच्या जळगाव स्थानिकस्वराज्य संस्था मतदारसंघाचीनिवडणूक अवघ्या तीन दिवसांवरयेऊन ठेपली आहे. महायुतीमधीलअंतर्गत तिढा सुटल्यानंतर रविवारीएमआयडीसीत महायुतीचा मेळावाझाला. व्यासपीठावर पालकमंत्रीगुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाखडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत सोनवणे, मंगेश चव्हाण, अमोल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्वच नेत्यांनी जळगाव हा महायुतीचा बालेकिल्ला असून, विजय निश्चित असल्याचा दावा केला. मेळाव्यात नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीवर बोलताना मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश महाजन आहेत. ही जागा भारतीय जनता पक्षाची पारंपरिक जागा राहिली असून, उत्तर महाराष्ट्राचे सर्व निर्णय गिरीश महाजन यांनीच घेतले आहेत. उमेदवारीसाठी प्रत्येकाला आपले नाव यावे असे वाटणे स्वाभाविक आहे; परंतु पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यावर सर्वांना काम करावेच लागते. पक्षात कोणतीही नाराजी नाही. खडसे यांच्या या विधानाने महाजन यांनीच किंगमेकरची भूमिका बजावल्याचे अधोरेखित झाले. रक्षा खडसे यांनी दिलेले हे क्रेडिट मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ नाकारले. ते म्हणाले नंदकिशोर महाजन हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीहून झाला आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी एकाने घेतला असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्याच्यावर माझा किंवा इतर कोणत्याही नेत्याचा शिक्का मारणे किंवा त्यांना गिरीश महाजनांचा उमेदवार म्हणणे चुकीचे आहे, असे बोलूही नये. महाजन यांनी त्यांच्या वक्तव्याला धन्यवाद म्हणत थेट पक्षश्रेष्ठींचाच शब्द अंतिम असल्याचे स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्षांनी बोलणे टाळले
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणालेनेत्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात १७ ठिकाणीनिवडणुका होत आहेत. सर्व १७ जागांवरमहायुतीचेच उमेदवार जिंकून येतील.जळगावची निवडणूक ही केवळ आताऔपचारिकता उरली आहे. महायुतीतीलअंतर्गत नाराजीबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्नविचारला असता चव्हाण यांनी त्यावरबोलणे स्पष्टपणे टाळले. ५५० मतांचा पालकमंत्र्यांचा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितले कीनिवडणुकीतील ५४ अपक्ष उमेदवार हे दुसऱ्याकोणत्याही पक्षाचे नसून आपल्याचमहायुतीचे आहेत. ७० टक्के निधी खर्चकरण्याचे अधिकार आमदारांना असून, त्यांनीनगरसेवकांना निधी दिला पाहिजे. विधानपरिषदेवर निवडून आल्यानंतर नंदकिशोरमहाजन यांनी छोट्या नगरपरिषदांच्याविकासाकडे विशेष लक्ष द्यावे. नगरसेवकांची घेतली हजेरी;सहलवारी टळल्याने नाराजी मत फुटू नये म्हणून नगरसेवकांनाअज्ञातस्थळी सहलीवर पाठवण्याची पद्धतआहे; मात्र यंदा ही सहलवारी टळल्यानेकाही नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूरहोता. मतदारांवर पकड ठेवण्यासाठीरविवारी चक्क मेळाव्यातच नगरसेवकांचीहजेरी घेण्यात आली. तिन्हीजिल्हाध्यक्षांवर ही जबाबदारी होती.यामध्ये जळगावचे ४७ तर शिवसेनेचे(शिंदे गट) २३ नगरसेवक उपस्थित होते.जे गैरहजर होते त्यांनी संपर्क साधूनआपण बाहेरगावी असल्याचे कळवले. मंत्र्यांची मतदारांना गिफ्ट ऑफर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी गिरीशमहाजन यांनी नगरपालिकांना थेट फंडाचीऑफर दिली. आपल्याकडे ५५० मते आहे.ज्या नगरपरिषदा, नगरपालिका सकाळी १०वाजेच्या आत १००% मतदान पूर्ण करतील,त्यांना निधी दिला जाईल असे सांगितले. महायुतीची रणनीती अशी महायुतीचे पदाधिकारीप्रत्येक गावात जाऊननगरसेवकांना मतदानकसे करावे, याचेप्रात्यक्षिक देणार.
मतदानाच्या दिवशी ७बूथ असून, प्रत्येकबूथची जबाबदारीनिश्चित आमदारांवरसोपवण्यात आली आहे.
महायुती उमेदवारालाराज्यात जास्त मताधिक्यमिळवून देण्याचा निर्धार.
सकाळी १० वाजेच्याआत १०० % मतदानकरणाऱ्या नपाला निधी.
ज्या मतदारांना काहीकारणास्तव मतदानकरणे शक्य नाही,त्यांच्या जागी येणाऱ्यादुसऱ्या व्यक्तीचीमाहिती तत्काळ दिलीजाणार.त्यादृष्टीनेनियोजन बैठकीतकरण्यात आले.
मतदार असलेल्यासर्व नगरसेवकांनामतदानाच्या आदल्यादिवशी बाहेरगावी नजाण्याच्या कडकसूचना देखील बैठकीत देण्यात आल्या आहे.
