साकोऱ्यात रात्रीत 7 घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास‎:पाच वर्षांनंतर पुन्हा‎ घरफोड्यांची मालिका‎

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे शनिवारी मध्यरात्री‎अज्ञात चोरट्यांनी एकाच परिसरातील सात घरे फोडून‎रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो‎रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना‎घडली. पाच वर्षांपूर्वी याच भागात झालेल्या‎घरफोड्यांच्या मालिकेची ही पुनरावृत्ती मानली जात‎असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.‎ माहितीनुसार, उन्हाळ्यामुळे अनेक कुटुंबीय घरांना‎कुलूप लावून गच्चीवर झोपले होते. याच संधीचा फायदा‎घेत चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी श्रीराम‎मंदिरालगतच्या रोहिदास गल्लीतील देवबा ठाकरे,‎विजय ठाकरे, चिंधा ठाकरे तसेच राजवाडा‎परिसरातील व्यंकट निकम, कल्याबाई निकम, विजय निकम‎यांच्या घरांचे कडी-कोयंडे तोडून‎घरफोडी केली. तसेच हेमंत निकम‎यांच्या घराच्या मागील बाजूची‎खिडकी काढून घरात प्रवेश‎करण्याचा प्रयत्न करण्यात आला.‎ मात्र घरातील सदस्य जागे‎ असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी‎तेथून पळ काढला. देवबा ठाकरे‎आणि विजय ठाकरे सकाळी घरात‎आले असता घरातील सामान‎ अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.‎ बाहेरगावी गेलेले इतर घरमालक घरी‎परतल्यानंतर त्यांच्या घरांतील रोख‎ रक्कम व दागिने चोरीला गेल्याचे‎समोर आले. घटनेची माहिती‎ मिळताच पोलिसांनी घटनास्थळी‎ धाव घेत पाहणी केली. दुपारी‎श्वानपथकानेही घटनास्थळी भेट देत‎तपासासाठी सुगावा घेतला.‎याप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात‎अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा‎दाखल करण्यात आला असून‎पुढील तपास सुरू आहे.‎ पाच वर्षांनंतर पुन्हा‎घरफोड्यांची मालिका‎ साकोरा येथे पाच वर्षांच्या अंतराने‎पुन्हा एकाच परिसरातील अनेक‎घरांवर घरफोड्यांची मालिका‎घडल्याने ग्रामीण भागातील‎सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.‎पूर्वीच्या घरफोडीतील आरोपी‎अद्याप सापडले नसताना नव्याने‎सात घरे फोडली गेल्याने‎पोलिसांच्या तपास आणि‎प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्न‎उपस्थित होत आहेत.‎ घरातील कपाट उचलून नेले शेतात‎ चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर काही वस्तू व कपाटे त्यांना खोलता ‎आली नाहीत. त्यामुळे चोरट्यांनी घरातील कपाटे थेट उचलून शेतात नेली व‎दगडाने फोडून त्यातील सुमारे ५० हजार रुपये रोख रक्कम तसेच‎सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचे उघड झाले.‎ मार्कंडेय पर्वतावर सुरक्षेसाठी तैनात बंदोबस्त‎‎ कळवण | तालुक्यातील प्रसिद्ध मार्कंडेय पर्वतावर सोमवती अमावस्येनिमित्त‎भरविण्यात येणारी मार्कंडेय ऋषी यात्रा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात‎आली असून भाविकांना पर्वतावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.‎सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले‎असून भाविकांसाठी पहिल्या पायरीवर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.‎

Leave a Comment

error: Content is protected !!