मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंनी एकत्र यावे:सरसकट कर्जमाफी म्हणजे काय आमदार-खासदार, बिल्डरांना द्यायची का?- बच्चू कडू

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित होत काम केले पाहिजे. दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजे. मराठी माणसांचा अभिमान असलेली शिवसेना एकत्र झाली पाहिजे. दोघांनी एकत्र येत महाराष्ट्रावर आपली सत्ता कशी मजबूत करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, मराठी माणसांचा आवाज म्हणून एकत्र येण्यास काही हरकत नाही, असे शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. बच्चू कडू म्हणाले की, सरसकट कर्जमाफी म्हणजे काय जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांना कर्जमाफी करायची का? सरसकट कर्जमाफीची व्याख्या ठरली पाहिजे. तुम्ही काय आमदार-खासदार आणि उद्योगपतींना कर्जमाफी देणार का? त्यांना सोडून कर्जमाफी करावी लागेल. ती यादी तयार करावी लागेल. शेतकऱ्यांची वर्गवारी केली पाहिजे. यामध्ये बिल्डर शेतकरी, व्यापारी शेतकरी, अधिकारी शेतकरी, लोकप्रतिनिधी शेतकरी, लेआऊट धारक शेतकरी बाजूला काढत खऱ्या शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो बच्चू कडू म्हणाले की, राजकारणात काय कधी होईल सांगता येत नाही. इथे कोणी कायम मित्र आणि शत्रू नसते. एकत्र शिवसेनेत राऊत चालतील का या प्रश्नावर बोलताना कडू यांनी असे म्हटले आहे. विनाकारण करतात त्यालाच राजकारण म्हणतात. शिवसेना एकत्र यावी अशी प्रार्थना आम्ही आई भवानीकडे करू असेही त्यांनी म्हटले आहे. राऊतांची गत आसाराम बापूंसारखी बच्चू कडू म्हणाले की, संजय राऊत हे जर कमी बोलले असते तर आज वेगळे चित्र राहिले असते. ते अधीक बोलले आणि काम काहीच केले नाही. लाख बोलण्याहून थोर, एकच माझा कर्तबगार, कर्तबगारी फार महत्त्वाची असते. आसाराम बापूची तुकराम महाराज यांच्याशी कधीही तुलना होऊ शकत नाही. तुकराम महाराज यांच्या कामात राम होता. ते कर्तृत्वातून समोर आले होते. आसाराम बापू सारखी राऊतांची गत आहे. पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात बच्चू कडू म्हणाले की, पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरले गेले तर ते पीक हाती येते पण आता त्यासाठी उशिरा झाला आहे. आता कोणते पीकं घ्यावे हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी काही भेटेल का अशी आशा शेतकऱ्यांची सरकारकडून आहे. मी कालसुद्धा या विषयासंदर्भात सभागृहात बोललो. सत्ता कुणाचीही असो शेतकरी डोक्यातून जाणार नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!