ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंनी एकत्र यावे:सरसकट कर्जमाफी म्हणजे काय आमदार-खासदार, बिल्डरांना द्यायची का?- बच्चू कडू

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित होत काम केले पाहिजे. दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजे. मराठी माणसांचा अभिमान असलेली शिवसेना एकत्र झाली पाहिजे. दोघांनी एकत्र येत महाराष्ट्रावर आपली सत्ता कशी मजबूत करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, मराठी माणसांचा आवाज म्हणून एकत्र येण्यास काही हरकत नाही, असे शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. बच्चू कडू म्हणाले की, सरसकट कर्जमाफी म्हणजे काय जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांना कर्जमाफी करायची का? सरसकट कर्जमाफीची व्याख्या ठरली पाहिजे. तुम्ही काय आमदार-खासदार आणि उद्योगपतींना कर्जमाफी देणार का? त्यांना सोडून कर्जमाफी करावी लागेल. ती यादी तयार करावी लागेल. शेतकऱ्यांची वर्गवारी केली पाहिजे. यामध्ये बिल्डर शेतकरी, व्यापारी शेतकरी, अधिकारी शेतकरी, लोकप्रतिनिधी शेतकरी, लेआऊट धारक शेतकरी बाजूला काढत खऱ्या शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो बच्चू कडू म्हणाले की, राजकारणात काय कधी होईल सांगता येत नाही. इथे कोणी कायम मित्र आणि शत्रू नसते. एकत्र शिवसेनेत राऊत चालतील का या प्रश्नावर बोलताना कडू यांनी असे म्हटले आहे. विनाकारण करतात त्यालाच राजकारण म्हणतात. शिवसेना एकत्र यावी अशी प्रार्थना आम्ही आई भवानीकडे करू असेही त्यांनी म्हटले आहे. राऊतांची गत आसाराम बापूंसारखी बच्चू कडू म्हणाले की, संजय राऊत हे जर कमी बोलले असते तर आज वेगळे चित्र राहिले असते. ते अधीक बोलले आणि काम काहीच केले नाही. लाख बोलण्याहून थोर, एकच माझा कर्तबगार, कर्तबगारी फार महत्त्वाची असते. आसाराम बापूची तुकराम महाराज यांच्याशी कधीही तुलना होऊ शकत नाही. तुकराम महाराज यांच्या कामात राम होता. ते कर्तृत्वातून समोर आले होते. आसाराम बापू सारखी राऊतांची गत आहे. पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात बच्चू कडू म्हणाले की, पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरले गेले तर ते पीक हाती येते पण आता त्यासाठी उशिरा झाला आहे. आता कोणते पीकं घ्यावे हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी काही भेटेल का अशी आशा शेतकऱ्यांची सरकारकडून आहे. मी कालसुद्धा या विषयासंदर्भात सभागृहात बोललो. सत्ता कुणाचीही असो शेतकरी डोक्यातून जाणार नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर