मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून, उपोषणाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राज्य सरकारसमोर मोठी मागणी ठेवली आहे. मराठा समाजाच्या कल्याणासाठी आपण हे आंदोलन करत असल्याचे सांगताना, सरकार बदलत राहतील, चर्चा सुरू राहतील; मात्र आपण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी शेतात उन्हात बसून उपोषण करणार असल्याचे जाहीर केले असून सरकारसोबत चर्चा देखील उन्हातच करणार असल्याचे सांगितले आहे. या संबंधीत अपडेट्स येथे पहा… मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया:मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका केली स्पष्ट