३१ ऑक्टोबर रोजी देवगुरू बृहस्पतीचा सिंह राशीत प्रवेश होत असल्याने शहरात ‘सिंहस्थ गुरु दोष’ लागणार आहे. या दोषामुळे नोव्हेंबर २०२६ पासून २३ जानेवारी २०२७ पर्यंत विवाह, वास्तूपूजन, भूमीपूजन, नवीन कामांचा शुभारंभ, मुंडन, यज्ञोपवीत व व्रत उद्यापन यासारखी सर्व शुभ कार्ये वर्ज्य राहणार असल्याचे अकोला पुरोहित संघाचे म्हणणे आहे. श्री बालाजी मंदिरात पुरोहित संघाची सभा आयोजित करण्यात आली. सभेत गोदावरी नदीचा नकाशा, मुहूर्त चिंतामणी, धर्म सिंधू, निर्णय सिंधू तसेच महाराष्ट्रीयन, सम्राट व निर्णय सागर पंचांगांचा आधार घेऊन हा निर्णय घेण्यात आला. सभेत गोदावरी नदीचा नकाशा, मुहूर्त चिंतामणी, धर्म सिंधू, निर्णय सिंधू तसेच महाराष्ट्रीयन, सम्राट व निर्णय सागर पंचांगांचा आधार घेऊन हा निर्णय घेण्यात आला. सभेत सांगण्यात आले की, या कालावधीत नक्षत्र पंचपाद व गुरु नवमांशाचा विशेष दोष राहील. त्यामुळे २३ जानेवारी २०२७ नंतरच शुभ कार्ये करण्यात यावीत. दरम्यान, २०२६-२७ मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे. सिंहस्थ गुरु दोषाचे नियम मलमास व गुरु-शुक्र अस्ताप्रमाणे पाळले जातात. मात्र वेगवेगळ्या गावांसाठी व राज्यांसाठी हे नियम बदलू शकतात, असेही पुरोहित संघाने स्पष्ट केले. आधुनिक ज्योतिषशास्त्राचे काही जाणकार सिंह राशीतील गुरु दोष मानत नाहीत, असेही सभेत नमूद करण्यात आले. सभेला पं. रमेश अडीचवाल, रतन तिवारी, नरेंद्र पंचारिया, लाला तिवारी, राजूभाई जाडा, प्रमोद तिवारी, श्याम सुंदर अवस्थी, आलोक शर्मा, सुमित तिवारी, भैरव शर्मा, सुरेश सिवाल व पं. रवि कुमार शर्मा आदी पुरोहित उपस्थित होते.
