जून महिन्याचा अर्धा कालावधी संपत आला तरी, अकोट तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्ह्यात अद्याप समाधा नकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. दरवर्षी या काळात शेतात पेरण्यांची लगबग पाहायला मिळते; मात्र यंदा पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम चांगलाच लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या या मोठ्या विलंबाने कोरडवाहू शेतकरी तर चिंतेत आहेतच, पण भूगर्भातील जलपातळी कमालीची घटण्याच्या भीतीने बागायतदार शेतकरीही पुरते धास्तावले आहेत. अल्प-मु दतीच्या पिकांना मोठा फटका बसणार तालुक्यात तूर, उडीद आणि मूग यासारखी अल्पमुदतीची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ही पिके साधारणपणे दसरा-दि ाळीच्या सुमारास हाती येतात. हा शेतीमाल बाजारात विकून कोरडवाहू शेतकरी आपले सण-उत्सव साजरे करतो. मात्र, जूनअखेर उजाडला तरी अद्याप पेरण्याच न झाल्यामुळे पिकांच्या संपूर्ण वेळापत्रकावर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होणार आहे. यामुळे उत्पादनात घट होईल. अकोट, तेल्हारा, हिवरखेडसह परिसरातील खाऱ्या पाण्याच्या अनेक गावांची तहान भागवणारे वान नदीवरील ‘हनुमान सागर धरण’ यंदा पावसाअभावी तळ गाठला आहे. ग्रामीण भागातील विहिरींचीपाणी पातळी खालावल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. ठोस मार्गदर्शन करावे ^पूर्वी उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे तिन्ही ऋतू वेळेवर फिरायचे. आता ऋतूचक्रच बदलले आहे. याचा थेट फटका पिकांच्या उत्पन्नावर होत आहे. बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. – रामचंद्र बरेठिया, शेतकरी. वान धरणाची जलपातळी खालावली; पाण्याचे संकट
