ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

ढगाळ वातावरण पण पाऊस गायब; खरिप हंगाम लांबणार:अल्प-मुदतीच्या तूर, उडीद, मूग पिकाला बसणार फटका‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जून महिन्याचा अर्धा कालावधी संपत आला तरी, अकोट तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्ह्यात अद्याप समाधा नकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. दरवर्षी या काळात शेतात पेरण्यांची लगबग पाहायला मिळते; मात्र यंदा पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम चांगलाच लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या या मोठ्या विलंबाने कोरडवाहू शेतकरी तर चिंतेत आहेतच, पण भूगर्भातील जलपातळी कमालीची घटण्याच्या भीतीने बागायतदार शेतकरीही पुरते धास्तावले आहेत. अल्प-मु दतीच्या पिकांना मोठा फटका बसणार तालुक्यात तूर, उडीद आणि मूग यासारखी अल्पमुदतीची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ही पिके साधारणपणे दसरा-दि ाळीच्या सुमारास हाती येतात. हा शेतीमाल बाजारात विकून कोरडवाहू शेतकरी आपले सण-उत्सव साजरे करतो. मात्र, जूनअखेर उजाडला तरी अद्याप पेरण्याच न झाल्यामुळे पिकांच्या संपूर्ण वेळापत्रकावर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होणार आहे. यामुळे उत्पादनात घट होईल. अकोट, तेल्हारा, हिवरखेडसह परिसरातील खाऱ्या पाण्याच्या अनेक गावांची तहान भागवणारे वान नदीवरील ‘हनुमान सागर धरण’ यंदा पावसाअभावी तळ गाठला आहे. ग्रामीण भागातील विहिरींचीपाणी पातळी खालावल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. ठोस मार्गदर्शन करावे ^पूर्वी उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे तिन्ही ऋतू वेळेवर फिरायचे. आता ऋतूचक्रच बदलले आहे. याचा थेट फटका पिकांच्या उत्पन्नावर होत आहे. बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. – रामचंद्र बरेठिया, शेतकरी. वान धरणाची जलपातळी खालावली; पाण्याचे संकट

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर