ब्रेकिंग न्यूज
मॅट्रिमोनी साईटवर ओळख; लग्नाची स्वप्नं…महिलेला भेटायला फ्रान्समधून पुण्यात आला, पण एअरपोर्टवरच इतकं मोठं … रक्षाबंधनाच्या स्नेहधाग्यातून समाजसेवेचा संकल्प; शिवसेना उबाठाचे वणीतील कौटुंबिक स्नेहमिलन उत्साहात 7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? फक्त 3 सोप्या स्टेप्स वापरून पाहा CRIME : भेटायला बोलवून किडनॅप अन् झाडाला बांधून जिवंत जाळलं; 28 वर्षाच्या इन्स्टाग्राम रीलस्टार तरुणीचा दुर… Navnath Ban Vs Amey Ghole News | नवनाथ बन आणि अमेय घोलेंमध्ये जुंपली | News18 Marathi Anaya Bangar : ऑस्ट्रेलियाकडून संधी मिळताच अनाया बांगरने BCCI वर व्यक्त केली नाराजी! पुरूषाची स्त्री झाली प… अल्पवयीन पोरं, शिकवतो म्हणून मुंबईला आणलं अन् नरकात ढकललं, पैशांसाठी बाप आणि आत्याचं भयानक कृत्य पोलीस बांधवांना राखी बांधून महिला सुरक्षेचा दिला संदेश मराठमोळ्या सचिनच्या घरी ओणमचं सेलिब्रेशन, अख्खं तेंडुलकर कुटुंब जमलं, पण एका गेस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं! भाई का बड्डे! कुख्यात गुन्हेगार तुरुंगात, टोळीचं भयंकर कांड, कारागृहाच्या भिंतीवरच…, Video व्हायरल होताच …
SP News Maregaon

गद्दार खासदारांना धडा शिकवण्याची वेळ आलीय:छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारी गद्दार औलाद अजूनही जिवंत; अरविंद सावंतांचा थेट हल्ला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उद्धव ठाकरे हे काही चार्टर्ड विमानाने आले नाही, त्यांचा दौरा ठरलेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते एकाच विमानातून आले हा केवळ योगायोग आहे, असे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. विमानात काही चर्चा होत नसते. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्याच लोकांसोबत अधिक लढावे लागले आणि छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात आपलीच गद्दार औलाद होती ती अजून थोडी थोडी जिवंत आहे. अरविंद सावंत म्हणाले की, यवतमाळ हा कुठल्या खासदारांचा मतदारसंघ नाही ती काही त्यांची मालकी नाही. मतदारसंघ लोकसभेचा आहे तो आम्ही जिंकला होता. मतदारांचा कौल हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे होता त्या मतदारांच्या कौलाचा हा अपमान विद्यमान खासदार यांनी केला. ते निवडून येण्यासाठी शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले. पण हे लाचार, व्याभिचारी औलाद यवतमाळमध्ये निर्माण झाली, यापूर्वीही असाच एक होता. त्यांचेही पहिले नाव तेच होते, असे म्हणत संजय राठोड यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तर दुसऱ्या गद्दाराला त्यावेळी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला असता पण उद्धव ठाकरेंनी वाचवल्याचेही सावंत म्हणाले. मतदारांनी मशालीला मतदान केले अरविंद सावंत म्हणाले की, लोकांचा मशालीवर विश्वास होता त्यांनी मशालीला मतदान केले त्यावर हे लोकं निवडून आले आणि मतदारांना न विचारता पक्ष सोडला. मतदारसंघातील कामांचे नाव पुढे करत हे लोकं तिकडे गेली. हे सर्व लोकं विकले गेलेले आहेत. त्यांच्या खासदार निधीचा वापर त्यांनी केला नाही, आणि निधीसाठी पक्षसोडावा लागला म्हणता ही गद्दारी आहे. त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. पक्षांतर करणे जनतेचा अपमान अरविंद सावंत म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी आणि कायदा-सुव्यवस्थेबद्दल बोलले जाते का? केवळ याला विकत घेतले हीच चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा दौरा महाराष्ट्रावर भगवा फडकवण्यासाठीच आहे. पक्षांतर करायचे असेल तर राजीनामा देत करावे लागेल असा कायदा आला पाहिजे. कोणाला न विचारता थेट पक्षांतर करणे हा जनतेचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर