ब्रेकिंग न्यूज
मॅट्रिमोनी साईटवर ओळख; लग्नाची स्वप्नं…महिलेला भेटायला फ्रान्समधून पुण्यात आला, पण एअरपोर्टवरच इतकं मोठं … रक्षाबंधनाच्या स्नेहधाग्यातून समाजसेवेचा संकल्प; शिवसेना उबाठाचे वणीतील कौटुंबिक स्नेहमिलन उत्साहात 7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? फक्त 3 सोप्या स्टेप्स वापरून पाहा CRIME : भेटायला बोलवून किडनॅप अन् झाडाला बांधून जिवंत जाळलं; 28 वर्षाच्या इन्स्टाग्राम रीलस्टार तरुणीचा दुर… Navnath Ban Vs Amey Ghole News | नवनाथ बन आणि अमेय घोलेंमध्ये जुंपली | News18 Marathi Anaya Bangar : ऑस्ट्रेलियाकडून संधी मिळताच अनाया बांगरने BCCI वर व्यक्त केली नाराजी! पुरूषाची स्त्री झाली प… अल्पवयीन पोरं, शिकवतो म्हणून मुंबईला आणलं अन् नरकात ढकललं, पैशांसाठी बाप आणि आत्याचं भयानक कृत्य पोलीस बांधवांना राखी बांधून महिला सुरक्षेचा दिला संदेश मराठमोळ्या सचिनच्या घरी ओणमचं सेलिब्रेशन, अख्खं तेंडुलकर कुटुंब जमलं, पण एका गेस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं! भाई का बड्डे! कुख्यात गुन्हेगार तुरुंगात, टोळीचं भयंकर कांड, कारागृहाच्या भिंतीवरच…, Video व्हायरल होताच …
SP News Maregaon

पक्षांतराला जनमताचा कौल घ्या!:फोडाफोडीच्या राजकारणावर मनसेची भूमिका, संसदेत विधेयक आणायला हवे, देशपांडे संजय राऊतांनाही करणार विनंती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या पक्षांतराच्या मालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) वेगळी भूमिका मांडली आहे. अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर राज्यातील पक्षांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात जनमत चाचणी घेणे बंधनकारक करण्याची संकल्पना मांडली आहे. तसेच हा विषय संसदेत उपस्थित करण्यासाठी आपण खासदार संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पक्ष बदलायचा असेल तर आधी जनतेचा कौल घ्या संदीप देशपांडे म्हणाले की, पक्षांतर हा केवळ राजकीय विषय नसून लोकशाहीच्या विश्वासार्हतेशी संबंधित मुद्दा आहे. एखाद्या आमदार किंवा खासदाराला पक्ष बदलायचा असेल, तर त्याने आधी आपल्या मतदारसंघातील जनतेचे मत जाणून घ्यावे. जगातील अनेक लोकशाही देशांमध्ये जनमत चाचणीची संकल्पना अस्तित्वात आहे. त्याच धर्तीवर भारतातही अशी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, लोकांनी जर पक्षांतराला मान्यता दिली तर कोणतीही अडचण नाही. मात्र, जनमत विरोधात गेले, तर संबंधित लोकप्रतिनिधीने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. विरोधी पक्ष कमकुवत झाला तर सरकारवर नियंत्रण कोण ठेवणार? देशपांडे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, लोकशाहीत सक्षम विरोधी पक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षात प्रवेश करू लागले, तर सरकारवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कोण पार पाडणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, विरोधी पक्षाने या विषयावर अशासकीय विधेयक आणावे. विधेयक मंजूर होणे वेगळा मुद्दा असला तरी निदान संसदेत या विषयावर गंभीर चर्चा सुरू होईल. संजय राऊतांना भेटून संसदेत मुद्दा मांडण्याची विनंती करणार या संकल्पनेबाबत समाजात व्यापक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत संदीप देशपांडे म्हणाले, “मी खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन हा विषय संसदेत मांडण्याची विनंती करणार आहे. जनमत चाचणीसारख्या व्यवस्थेवर चर्चा व्हायला हवी.” ते पुढे म्हणाले की, सामान्य नागरिकाला केवळ पाच वर्षांतून एकदाच मतदानाचा अधिकार मिळतो. मात्र एखादा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर पक्ष बदलत असेल, तर त्या निर्णयावर मतदारांना आपले मत व्यक्त करण्यासाठी कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नाही. ही उणीव दूर करण्याची गरज आहे. सर्व पक्षांसाठी समान नियम असावेत देशपांडे यांनी स्पष्ट केले की, त्यांची भूमिका कोणत्याही एका पक्षापुरती मर्यादित नाही. उद्या भाजपचा एखादा खासदार काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेत असेल, तरी त्यालाही जनमत चाचणीला सामोरे जावे लागावे, अशीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “ही भूमिका केवळ शिवसेना, राष्ट्रवादी किंवा इतर कोणत्याही पक्षापुरती नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधीने पक्षांतर करण्यापूर्वी मतदारांचा कौल घेणे आवश्यक असले पाहिजे,” असे ते म्हणाले. कायद्यात तरतूद करण्याची मागणी या प्रक्रियेसाठी स्वतंत्र कायदेशीर तरतूद करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकार किंवा निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनमत चाचणी घेण्यास तयार नसतील, तर एखाद्या स्वतंत्र आणि तटस्थ संस्थेमार्फत ही प्रक्रिया राबवता येऊ शकते, असे त्यांनी सुचवले. ब्रिटनने युरोपियन संघातून बाहेर पडण्यापूर्वी ‘ब्रेक्झिट’साठी जनमत चाचणी घेतली होती, त्याचा दाखला देत देशपांडे म्हणाले, “इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्की सापडतो. लोकांना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठीही लोकशाहीत प्रभावी यंत्रणा असायला हवी.” संदीप देशपांडे यांनी मांडलेल्या या प्रस्तावामुळे पक्षांतराच्या राजकारणावर नव्या प्रकारची चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर