ब्रेकिंग न्यूज
मॅट्रिमोनी साईटवर ओळख; लग्नाची स्वप्नं…महिलेला भेटायला फ्रान्समधून पुण्यात आला, पण एअरपोर्टवरच इतकं मोठं … रक्षाबंधनाच्या स्नेहधाग्यातून समाजसेवेचा संकल्प; शिवसेना उबाठाचे वणीतील कौटुंबिक स्नेहमिलन उत्साहात 7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? फक्त 3 सोप्या स्टेप्स वापरून पाहा CRIME : भेटायला बोलवून किडनॅप अन् झाडाला बांधून जिवंत जाळलं; 28 वर्षाच्या इन्स्टाग्राम रीलस्टार तरुणीचा दुर… Navnath Ban Vs Amey Ghole News | नवनाथ बन आणि अमेय घोलेंमध्ये जुंपली | News18 Marathi Anaya Bangar : ऑस्ट्रेलियाकडून संधी मिळताच अनाया बांगरने BCCI वर व्यक्त केली नाराजी! पुरूषाची स्त्री झाली प… अल्पवयीन पोरं, शिकवतो म्हणून मुंबईला आणलं अन् नरकात ढकललं, पैशांसाठी बाप आणि आत्याचं भयानक कृत्य पोलीस बांधवांना राखी बांधून महिला सुरक्षेचा दिला संदेश मराठमोळ्या सचिनच्या घरी ओणमचं सेलिब्रेशन, अख्खं तेंडुलकर कुटुंब जमलं, पण एका गेस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं! भाई का बड्डे! कुख्यात गुन्हेगार तुरुंगात, टोळीचं भयंकर कांड, कारागृहाच्या भिंतीवरच…, Video व्हायरल होताच …
SP News Maregaon

‘महारेल’कडे ‘आरओबी’चे काम दिल्यास पुनर्बांधणीत विलंबाची शंका:पावसाळी अधिवेशनात आ. संजय खोडके यांनी उपस्थित केला मुद्दा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील राजकमल रेल्वे उड्डाणपुलाच्या (आरओबी) पुनर्बांधणीचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) कडे हस्तांतरित केल्यास सर्व तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय प्रक्रिया नव्याने कराव्या लागतील. त्यामुळे प्रकल्पाला मोठा विलंब होऊन काम रखडण्याची शक्यता असल्याचा मुद्दा विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. मागील दहा महिन्यांपासून धोकादायक ठरलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद आहे. परिणामी शहरात वाहतूक कोंडी वाढून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पात पुलाच्या पुनर्बांधणीसाठी १२५.३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता, आराखडा, डिझाईन आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे. अशा स्थितीत काम महारेलकडे वर्ग केल्यास सर्वेक्षण, डिझाईन, आराखडा आणि तांत्रिक मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. त्यामुळे प्रकल्पाच्या पूर्णत्वास अनावश्यक विलंब होण्याची शक्यता असल्याचे खोडके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. राजकमल चौक, हमालपुरा, रेल्वे स्थानक आणि जयस्तंभ चौक या शहरातील प्रमुख भागांना जोडणारा हा उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे एजन्सी न बदलता सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच काम कायम ठेवून १२५.३७ कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याची मागणी आ. संजय खोडके यांनी सरकारकडे केली. आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अमरावती रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम लवकरच पूर्ण होऊन सार्वजनिक वाहतूक सुलभ होण्याचा मार्ग अधिक प्रशस्त होत असतांनाच आता अचानक सदर काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित करण्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहे. यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, अमरावती जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विशेषतः मेळघाटसारख्या आदिवासी भागातील गरजा लक्षात घेऊन नवजात बालकांसाठी अतिदक्षता सेवा उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असून, हा प्रस्ताव विशेष बाब म्हणून विचारात घेतला जाईल. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुलभा संजय खोडके यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या बळकटीकरणाचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे विधानसभेत उपस्थित केला. जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे नवजात बालकांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) स्थापन करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली. आ. खोडके यांनी सभागृहात सांगितले की, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे आरोग्य सुविधा विकसित होत असल्या तरी डफरीन रुग्णालयातील ४६ खाटांचे एनआयसीयू हे शहरासह ग्रामीण व मेळघाट-धारणीसारख्या दुर्गम आदिवासी भागातील नवजात बालकांवर उपचाराचा मोठा भार सांभाळत आहे. त्यामुळे गंभीर व मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांना वेळेत आणि प्रभावी उपचार देताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत हस्तांतरित झाल्यानंतर तेथे स्वतंत्र एनआयसीयू सुरू करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे गंभीर अवस्थेतील नवजात बालकांना तातडीने उपचार मिळून मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर