ब्रेकिंग न्यूज
मॅट्रिमोनी साईटवर ओळख; लग्नाची स्वप्नं…महिलेला भेटायला फ्रान्समधून पुण्यात आला, पण एअरपोर्टवरच इतकं मोठं … रक्षाबंधनाच्या स्नेहधाग्यातून समाजसेवेचा संकल्प; शिवसेना उबाठाचे वणीतील कौटुंबिक स्नेहमिलन उत्साहात 7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? फक्त 3 सोप्या स्टेप्स वापरून पाहा CRIME : भेटायला बोलवून किडनॅप अन् झाडाला बांधून जिवंत जाळलं; 28 वर्षाच्या इन्स्टाग्राम रीलस्टार तरुणीचा दुर… Navnath Ban Vs Amey Ghole News | नवनाथ बन आणि अमेय घोलेंमध्ये जुंपली | News18 Marathi Anaya Bangar : ऑस्ट्रेलियाकडून संधी मिळताच अनाया बांगरने BCCI वर व्यक्त केली नाराजी! पुरूषाची स्त्री झाली प… अल्पवयीन पोरं, शिकवतो म्हणून मुंबईला आणलं अन् नरकात ढकललं, पैशांसाठी बाप आणि आत्याचं भयानक कृत्य पोलीस बांधवांना राखी बांधून महिला सुरक्षेचा दिला संदेश मराठमोळ्या सचिनच्या घरी ओणमचं सेलिब्रेशन, अख्खं तेंडुलकर कुटुंब जमलं, पण एका गेस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं! भाई का बड्डे! कुख्यात गुन्हेगार तुरुंगात, टोळीचं भयंकर कांड, कारागृहाच्या भिंतीवरच…, Video व्हायरल होताच …
SP News Maregaon

अनुसूचित जातीच्या 59 जातींचा जनसागर रस्त्यावर उतरणार:उपवर्गीकरणाचा घाट हाणून पाडण्यासाठी तिवस्यात ‘एल्गार मोर्चा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशात हिंदू-मुस्लिम वाद पेटवल्यानंतर आता केंद्र व राज्य सरकारने जाती-जातीत भांडणे लावण्याचे राजकारण सुरू केले आहेत. अनुसूचित जातीतील ५९ जातींचे हक्काचे १३ टक्के आरक्षण संपवण्याचा सरकारचा हा कुटील डाव असून, हा उपवर्गीकरणाचा घाट कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडला जाईल, असा इशारा तिवसा येथील उपवर्गीकरण कृती समितीने दिला आहे. या धोरणाविरोधात येत्या ३० जून रोजी दुपारी १२ वाजता तिवसा येथे ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोर्चात ५ हजारपेक्षा जास्त आंबेडकरी जनसागर रस्त्यावर उतरणार असून, तालुक्यातील सामाजिक व राजकीय वातावरण या निमित्ताने कमालीचे तापले आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या सरकारच्या धोरणाविरोधात तिवसा तालुक्यातील समाज बांधव अत्यंत आक्रमक झाले आहेत. ५९ जातींना एकसंघ ठेवण्याच्या उद्देशाने काढण्यात येणारा हा मोर्चा केवळ आंदोलन नसून, येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी आणि सरकारच्या जातीवादी धोरणांचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेली लढाई असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यातील प्रत्येक गावात आणि बौद्ध विहारांमध्ये युद्धपातळीवर जनजागृती केली जात आहे. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या ऐतिहासिक एल्गार मोर्चाची सुरुवात होईल. या मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे भीम सैनिक महापुरुषांची वेशभूषा करून यामध्ये सामील होणार आहेत. विशेष म्हणजे, सर्वपक्षीय राजकीय नेते, विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते पक्षभेद विसरून या आंदोलनात एकवटणार आहेत. पत्रकार परिषदेला अनिल थूल, प्रशांत कांबळे, संदीप चक्रनारायण, सागर भवते, जानराव मनोहर, राजेंद्र शेंडे, भारत दाहाट, दिलीप जवंजाळ, संदीप दाहाट, प्रशिक शापामोहन आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आरक्षणाचे उपवर्गीकरण नुकसानदायक महाराष्ट्रातील ५९ जाती आजवर गुण्यागोविंदाने एकत्र राहत आल्या आहेत. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या या जातींमध्ये आरक्षणाच्या नावाखाली भांडणे लावून १३ टक्के आरक्षण मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर आरक्षणाचे उपवर्गीकरण झाले, तर ५९ जातींमधील एकाही घटकाचे शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक उत्थान होणार नाही, ते पूर्णपणे रखडेल. म्हणूनच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तालुक्यातील ५९ जातींनी मोठ्या संख्येने या एल्गार मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर