ब्रेकिंग न्यूज
मॅट्रिमोनी साईटवर ओळख; लग्नाची स्वप्नं…महिलेला भेटायला फ्रान्समधून पुण्यात आला, पण एअरपोर्टवरच इतकं मोठं … रक्षाबंधनाच्या स्नेहधाग्यातून समाजसेवेचा संकल्प; शिवसेना उबाठाचे वणीतील कौटुंबिक स्नेहमिलन उत्साहात 7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? फक्त 3 सोप्या स्टेप्स वापरून पाहा CRIME : भेटायला बोलवून किडनॅप अन् झाडाला बांधून जिवंत जाळलं; 28 वर्षाच्या इन्स्टाग्राम रीलस्टार तरुणीचा दुर… Navnath Ban Vs Amey Ghole News | नवनाथ बन आणि अमेय घोलेंमध्ये जुंपली | News18 Marathi Anaya Bangar : ऑस्ट्रेलियाकडून संधी मिळताच अनाया बांगरने BCCI वर व्यक्त केली नाराजी! पुरूषाची स्त्री झाली प… अल्पवयीन पोरं, शिकवतो म्हणून मुंबईला आणलं अन् नरकात ढकललं, पैशांसाठी बाप आणि आत्याचं भयानक कृत्य पोलीस बांधवांना राखी बांधून महिला सुरक्षेचा दिला संदेश मराठमोळ्या सचिनच्या घरी ओणमचं सेलिब्रेशन, अख्खं तेंडुलकर कुटुंब जमलं, पण एका गेस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं! भाई का बड्डे! कुख्यात गुन्हेगार तुरुंगात, टोळीचं भयंकर कांड, कारागृहाच्या भिंतीवरच…, Video व्हायरल होताच …
SP News Maregaon

स्वच्छतेची जबाबदारी केवळ मनपाची नसून प्रत्येक नगरकरांचीही- महापौर:शाहू महाराज जयंतीनिमित्त अभियान; सक्कर चौक परिसराची केली साफसफाई‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरभर विशेष स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. “स्वच्छतेमुळे शहराचे सौंदर्य वाढतेच, शिवाय नागरिकांचे आरोग्यही सुदृढ राहते. ही जबाबदारी केवळ महापालिकेची नसून प्रत्येक नगरकरांची आहे, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. यापुढे प्रत्येक दहा दिवसांनी शहरातील विविध भागांमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आल्यानंतर सक्कर चौक येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी मनपा आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक सुरेश बनसोडे, महेश तवले, मयूर बांगरे, प्रकाश भागानगरे, रेवन्नाथ पवार, गोरख पडेाळे, सुरज कोतकर यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर गाडे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता करत अभियानाची सुरुवात केली. आमदार संग्राम जगताप हे शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सातत्याने स्वतः रस्त्यावर उतरून मोहिमेत सहभागी होत असून प्रशासनाला गती देत असल्याचे महापौरांनी आवर्जून सांगितले. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व्यापक स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. आपले शहर कचराकुंडीमुक्त झाले असल्यामुळे रस्त्यांवर कुठेही कचराकुंडी दिसणार नाही. मात्र, काही नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकून ढीग निर्माण करतात, ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. सर्वांनी कचरा केवळ घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले. तसेच संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय “ॲक्शन मोड’ आणि लोकसहभाग मनपा आयुक्त यशवंत डांगे हे दररोज सकाळी शहराची पाहणी करत असून आढळलेला कचरा तातडीने उचलण्याच्या सूचना प्रशासनाला देत आहेत. स्वतः फिल्डवर उतरून ते काम करत आहेत. घंटागाडीचाच वापर करा: दैनंदिन स्वच्छता मनपा करत आहे; पण नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता तो घंटागाडीतच द्यावा, असे आवाहन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर