ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

शेतकरी मेळावा:आधुनिक शेती, संघटन शक्‍तीनेच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटतील- पद्मश्री डॉ. श्रीरंगदादा लाड

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची संघटन शक्ती या दोनच गोष्टींच्या जोरावर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात. शेतकऱ्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी भारतीय किसान संघ राज्यभर मेळावे घेऊन शेतकऱ्यांना संघटित करत आहे. आगामी काळात आपल्या हक्कांसाठी तीव्र संघर्ष करावा लागेल, असा विश्वास पद्मश्री कृषी संशोधक डॉ. श्रीरंगदादा लाड यांनी व्यक्त केला. अहमदपूर तालुक्यातील राजूर येथील साईगणेश मंगल कार्यालयात भारतीय किसान संघाच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम येलाले, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, निवृत्त सिंचन सचिव घोटे, महिला विभाग प्रमुख शामल हुरदळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना डॉ. लाड म्हणाले, देशाचे उत्पन्न शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी तंत्रशुद्ध शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. आम्ही कापूस पिकावर प्रयोग करून एकरी २५ क्विंटल कापूस उत्पादित होऊ शकतो हे सिद्ध केले आहे. आता आमचा मोर्चा ज्वारीकडे वळला असून, एकरी किमान ५० क्विंटल ज्वारीचे उत्पन्न घेण्याबाबतचे संशोधन सध्या सुरू आहे. उत्पन्न वाढीसोबतच शेतमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी सर्व शेतकर्‍यांनी एकत्र येऊन संघर्ष करणे गरजेचे आहे. या मेळाव्यात तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, निवृत्त सिंचन सचिव घोटे, आणि मधुमक्षिका पालक दिनकर पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अमोल नरहारे व गोविंद गिरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजकुमार मजगे यांनी केले. सरकारच्या जाचक अटींवर किसान संघाने आवाज उठवावा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार बब्रुवान खंदाडे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासकीय योजना असल्या तरी शेतकऱ्यांनी स्वतःहून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे. तसेच सरकारनेही शेतमालाला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. पीक विमा आणि त्यातील जाचक अटींमुळे शेतकरी अडचणीत असून, भारतीय किसान संघाने या समस्या सरकार दरबारी मांडून त्या सोडवाव्यात, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर