ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.८६%:यंदा निकालाची टक्केवारी घसरली; काॅपीमुक्त अभियानाचा परिणाम, मुलींनीच मारली बाजी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्ह्याचा यावर्षी बारावीचा निकाल ८२.८६ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी ६ टक्क्यांनी घसरली आहे. कॉपीमुक्त अभियानामुळे निकालावर परिणाम झाल्याचे शैक्षणिक वर्तुळातून बोलले जात आहे. तर अपेक्षे प्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधून १४४९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४१९८ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यामध्ये ३८३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून २५०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६५३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २३३९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. जिल्हातील एकूण ११७६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८२.८६ टक्के लागला आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल ८८.५४ टक्के लागला होता. यावर्षी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रभारी शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या पथकाने कॉपीमुक्त अभियान राबविले. प्रत्येक केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले होते. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले होते. संवेदनशील परिक्षा वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु ठेवण्यात आला होता. दरम्यान, यावर्षीही अपेक्षे प्रमाणेत मुलींनीच निकालामध्ये बाजी मारली अाहे. या परिक्षेसाठी जिल्हयातील ७५९० विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी ५८३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ७६.८१ टक्के आहे. तर जिल्ह्यातून ६६०८ विद्यार्थीनींपैकी ५९३५ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थीनींची टक्केवारी ८९.८१ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९२.८६ टक्के जिल्ह्यात विज्ञान शाखेत ७५४४ पैकी ७००६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९२.८६ टक्के आहे. कला शाखेतून ५७७३ विद्यार्थ्यापैकी ४१०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७१.०५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून ६९५ पैकी ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७१.७९ टक्के लागला आहे. तसेच किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमात १८६ पैकी १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८४.९४ टक्के लागला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर